yogi adityanath 
देश

शेतकऱ्यांना राम राम म्हणा तर गुन्हेगारांचे राम नाम सत्य करा; योगींचे पोलिसांना आदेश

सकाळ डिजिटल टीम

मेरठ - सध्या शेतकऱ्यांचे दिल्ली हरियाणाच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. गेल्या 19 दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनात आता शेतकरी नेत्यांनी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये राम राम आणि राम नाम सत्यचे वक्तव्य त्यांनी केले आहे. रविवारी मेरठ इथं झालेल्या रॅलीमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, जेव्हा शेतकऱ्यांना भेटाल तेव्हा राम राम म्हणा असे आदेश पोलिसांना दिले आहेत. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं की, शेतकऱ्यांसोबत अन्याय होणार नाही. आम्ही पोलिसांना आदेश दिले आहेत की ज्यावेळी शेतकरी बांधवांची भेट होईल तेव्हा त्यांच्याशी बोलताना राम राम म्हटलं पाहिजे तर बहिणी-मुलींवर अत्याचार करणाऱ्या, सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांचे राम नाम सत्य झाले पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभारंभ केला. विरोधक म्हणायचे की हे निवडणुकीपुरतं आहे आणि कोरोनाच्या काळात थांबेल. तेव्हा पंतप्रधानांनीच सांगितलं होतं की, मंत्री आणि खासदारांचे वेतन थांबेल पण शेतकऱ्यांसाठी सुरु केलेला शेतकरी सन्मान निधी थांबणार नाही असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. 

देशातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मेरठ इथं झालेल्या रॅलीत योगी म्हणाले की, शेतकरी बांधवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताच्या एकतेला आव्हान दिलं जात आहे. देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचं काम केलं जात आहे आणि हे कधीच सहन केलं जाणार नाही. कोणताही प्रश्न हा संवादाने सुटेल, संघर्षाने नाही.

शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. त्याच्या पीकाचा आणि उत्पादनाचा मालकही असतो. त्याला त्याचे पीक कुठं विकायचं हे ठरवण्याचा अधिकार आहे. त्यावर बाजारात किंवा बाजाराबाहेर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाऊ नये असं पंतप्रधानांनी सांगितल्याचंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT