देश

लदाख की काश्मीर? विद्यार्थ्यांना शिकवायचे काय?

सकाळ वृत्तसेवा

जम्मू : जम्मू-काश्‍मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द झाल्यानंतर बरेच दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती. बंद असलेल्या शाळा आता सुरू झाल्या आहेत. परंतु, विद्यार्थ्यांना शिकवायचे काय? असा प्रश्‍न येथील शिक्षकांना पडला आहे. 

जम्मू-काश्‍मीर राज्याची दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. ही विभागणी आणि कलम 370 रद्द होणे म्हणजे काय, हे विद्यार्थ्यांना कसे सांगावे, असा प्रश्‍न शिक्षकांना पडला आहे. जम्मू हा प्रदेश हिंदूबहुल, काश्‍मीर मुस्लिमबहुल व लडाख बौद्धबहुल आहे. राज्यातील सध्याची शैक्षणिक पुस्तके आणि अभ्यासक्रमात बदल करावे लागणार आहेत. काश्‍मीरमधील एका महिला शिक्षिकेने म्हटले, ""मला विद्यार्थ्यांना काय शिकवावे तेच कळत नाहीये. आतापर्यंत आम्ही आपल्या राज्याची स्वतंत्र राज्यघटना, ध्वज आणि नागरिकत्व आहे, असे शिकवत होतो. परंतु, आता त्यांना काय शिकवावे याबाबत संभ्रम आहे.'' आतापर्यंत शिकवत असलेला भूगोलही बदलला आहे. ऑक्‍टोबरच्या शेवटपर्यंत शिक्षकांकडे नवीन अभ्यासक्रम पोहोचण्याची शक्‍यता आहे. राज्याचा नकाशा बदलला आहे. लोकसंख्येची गणिते बदलली आहेत. अभ्यासक्रमातील काही मुद्द्यांमध्ये बदल करावा लागेल; तर काही मुद्दे कायमस्वरूपी रद्द होतील. 

हा प्रश्‍न फक्त काश्‍मीर परिसरापुरता मर्यादित नाही. जम्मू, काश्‍मीर व लडाख या तिन्ही परिसरातील शैक्षणिक यंत्रणा काहीशी थंडावली आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना "विभाजन का केले', या प्रश्‍नाचे उत्तर कसे द्यायचे हा प्रश्‍न शिक्षकांना पडला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT