देश

आठ वर्षांत  भारतात ७५० वाघांचा मृत्यू; राष्ट्रीय वाघ्रसंवर्धन प्राधिकरणाची माहिती

पीटीआय

नवी दिल्ली- शिकार व अन्य कारणांमुळे आठ वर्षांत भारतात ७५० वाघांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक दुर्घटना मध्य प्रदेशमध्ये घडल्या असून तेथे १७३ वाघांचा मृत्यू झाला आहे. 

माहिती अधिकारात ‘पीटीआय’ने विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देताना राष्ट्रीय वाघ्रसंवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) ही माहिती दिली. ७५० मृत वाघांपैकी ३६९ वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला असून १६८ वाघांची शिकार झाली तर ७० मृत्यूंची छाननी होत असून ४२ वाघांना अनैसर्गिक मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. देशात अधिकृतरीत्या २०१२ ते २०१९ या काळात १०१ वाघांना पकडण्यात आले. 

वाघांची संख्या व मृत्यूही अधिक 
देशात मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक ५२६ वाघ आहेत. मात्र आठ वर्षांत वाघांचे सर्वाधिक १७३ मृत्यूही तेथेच नोंदविले आहेत. यातील ३८ वाघांची शिकार, ९४ नैसर्गिक मृत्यू, सहा अनैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाले. १६ वाघ पकडण्यात आले तर १९ मृत्यूंची चौकशी सुरू आहे. 

बेपत्ता वाघांची माहिती नाही 
माहिती अधिकारातील अर्जात २०१० ते मे २०२० या काळातील वाघांच्या मृत्यूंची माहिती ‘एनटीसीए’कडून मागविली होती. पण त्यांनी २०१२ पासून आठ वर्षांचीच माहिती दिली. वाघांच्या मृत्यूंवर काय उपाययोजना केली, हे ‘एनटीसीए’ने स्पष्ट केले नाही. देशातील बेपत्ता वाघांची माहिती उपलब्ध नसल्याने सांगून यासाठी १८ राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांच्या मुख्य वन अधिकाऱ्यांकडे संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला. 

शिकार आणि अन्य कारणांमुळे भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांचे मृत्यू होणे ही चिंताजनक बाब आहे. वन्यजीव गुन्ह्यांमधील दोषींना जबर शिक्षेची तरतूद केली पाहिजे. शिकारीपासून वाघांचा बचाव करण्यासाठी प्रयत्नही होणे आवश्‍यक आहे. 
अजय दुबे, वन्यजीव कार्यकर्ते, भोपाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT