raosaheb danve saka
देश

शरद पवार यांनी काँग्रेसवर केलली टीका अचूक आहे - दानवे

कारण ते त्या घरात राहिले आहेत. त्या घराचे कोणते खांब ढासळले, याची त्यांना चांगली माहिती आहे, अशा शब्दांत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पवारांच्या टिकेचे समर्थन केले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काँग्रेसवर केलली टीका अचूक आहे. कारण ते त्या घरात राहिले आहेत. त्या घराचे कोणते खांब ढासळले, याची त्यांना चांगली माहिती आहे, अशा शब्दांत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पवारांच्या टिकेचे समर्थन केले. ते इमारतीला बाहेरून टेकू देत आहेत, ते काँग्रेसच्या त्या पडक्या हवेलीत कधीच जाणार नाहीत, असे मतही दानवे यांनी व्यक्त केले.

दानवे यांच्याबरोबर दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी सकाळने संवाद साधला. महाराष्ट्रातील राजकीय टिकांबाबत बोलताना त्यांनी हे भाष्य केले. राज्यातील सरकार हे अमर, अकबर, अँथनीचे सरकार आहे. ते समान उदि्दष्ट ठेऊन एकत्र आले आहे. त्यामुळे पवार किती टोकदार बोलले, तर सरकार पडणार नाही. त्यांचा उद्देश साध्य झाला की ते सरकार असे‌ पडेल की त्यांनाच कळणार नाही. पवारांची टीका ही सत्य आहे. आता त्यांना काँग्रेस परत बोलवत आहे. पण पवार त्या पडक्या घरात जाणार नाहीत.

ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत आहेत. याबाबत ते म्हणाले, "राज्य सरकारने एम्पिरिकल डाटा कोर्टात सादर केला नाही. त्यामुळे आरक्षण टिकले नाही. या सरकारने वकिलांची फौज न्यायालयात उभी करायला पाहिजे होती. पण ते या सगळ्याचे खापर केंद्रावर फोडत राहिले. आता हा धंदा त्यांनी बंद करावा. केवळ मोर्चे काढून आणि स्वत:ला ओबीसी नेता असल्याचे मिरवत आरक्षण मिळणार नाही. ओबीसी समाजाची दिशाभूल करण्यापेक्षा सरकारने पुरावे सादर‌ करावेत, केवळ समाजासमोर चमकू नये, असा सल्ला दानवे यांनी छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांना दिला.

ईडी, सीबीआयचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप केला जातोय, या प्रश्नावर दानवे यांना हा आरोप फेटाळला. ते म्हणाले, " अशोक चव्हाण यांची चौकशी कुणी केली? छगन भुजबळ, सुरेश कलमाडी, लालू प्रसाद यादव या नेत्यांना जेलमध्ये कुणी पाठवले? भाजप सरकार त्यावेळी नव्हते. या संस्थांचा वापर हा काँग्रेसच्या काळापासूनच सुरू आहे. आम्ही त्याचा कधीही गैरवापर केलेला नाही. ज्यांची चौकशी सुरू आहे, त्यांच्यावर आरोपही गंभीर आहेत."अनिल देशमुख कुठे हे राज्य सरकारला माहिती आहे. ते कुठे जाणार आहेत? ते सापडत नसतील, तर हे राज्य सरकारचे अपयश आहे. त्यांना सरकारने शोधावे, असे दावने म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडसह आरोपींना कोर्टाचा दणका, संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोप निश्चिती

Navi Mumbai: बदलापूर ते पनवेल एका झटक्यात होणार पार! नवा मार्ग कसा असणार? जाणून घ्या...

Sugar Factory Protest : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या साखर कारखान्यावर दगडफेक; मळी मिश्रित पाण्यावरून भेंडवडे ग्रामस्थांचा संताप अनावर

Madhya Pradesh Forts: भारताच्या हृदयातील इतिहास; मध्य प्रदेशातील ५ किल्ले जे आजही पराक्रमाची साक्ष देतात

Year Ender 2025 : या सरकारी योजनांनी बदललं लाखो लोकांचं आयुष्य; जाणून घ्या या वर्षातील टॉप योजना

SCROLL FOR NEXT