nana patole sakal media
देश

ममतांच्या तिसऱ्या आघाडीबद्दल शिवसेनेची भूमिका योग्यच - नाना पटोले

काँग्रेसशिवाय तिसऱ्या आघाडीवर शिवसेना नाराज असल्याचं दिसत आहे.

सुधीर काकडे

देशात सध्या तिसऱ्या आघाडीची मोठी चर्चा सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर हा मुद्दा आणखी चर्चेत आला आहे. आज शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून देखील या विषयावर भाष्य करण्यात आले आहे. त्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेची ही भूमिका योग्य असून, देशात सध्या ज्या पद्धतीने केंद्र सरकार काम करतंय, ते पाहून, देश हीत समजणारी कोणतीही व्यक्ती असाच विचार करेल असं पटोले म्हणाले आहे.

काँग्रेसशिवायच्या तिसऱ्या आघाडीचा विचार करणाऱ्यांवर सामनाने खरमरीत टीका केली आहे. युपीचं नेतृत्व कोणी करायचं यावरून काँग्रेसची गाडी मागे खेचण्यापेक्षा सध्या देशासमोर भाजपला पर्याय उभं करण्याची गरज असल्याची भूमिका सामनातून मांडण्यात आली होती. यावर नाना पटोले यांनी सामनाची ही भूमिका योग्य असल्याचं सांगितलं आहे.

भाजपचं सरकार केंद्रात आल्यापासून त्यांनी देशाची तबाही सूरू केली. चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी केली, रोज देशाची संपत्ती विकली जातेय, संविधानिक व्यवस्था तोडण्याचं काम केलं जातंय, त्यामुळे अशा वेळी काँग्रेसला विरोध करणं म्हणजे भाजपला साथ असल्याचं ममता पटोलेंनी सांगितलं. तसेच ते म्हटले की, आता देश विकणाऱ्यांबरोबर जायचं की देशाला वाचवणाऱ्यांबरोबर जायचं ते प्रत्येक पक्षाने ठरवावं असं त्यांनी सांगितलं.

भाजपचं सरकार केंद्रात आल्यापासून त्यांनी देशाची तबाही सूरू केली. चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी केली, रोज देशाची संपत्ती विकली जातेय, संविधानिक व्यवस्था तोडण्याचं काम केलं जातंय, त्यामुळे अशा वेळी काँग्रेसला विरोध करणं म्हणजे भाजपला साथ असल्याचं ममता पटोलेंनी सांगितलं. तसेच ते म्हटले की, आता देश विकणाऱ्यांबरोबर जायचं की देशाला वाचवणाऱ्यांबरोबर जायचं ते प्रत्येक पक्षाने ठरवावं असं त्यांनी सांगितलं.“दैवी अधिकारांचा घोळ!” या शीर्षकाखालील अग्रलेखात ममता बॅनर्जींसह प्रशांत किशोर यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला आहे. युपीए नेतृत्वाचा दैवी अधिकार कुणा एकाकडेच नाही असं वक्तव्य ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी केलं होतं. त्यावर या अग्रलेखात दैवी अधिकार कुणाला हे येणारा काळ ठरवेल असे म्हणत काँग्रेस शिवाय तिसऱ्या आघाडीच्या मुद्याला शिवसेनेने विरोध केल्याचं दिसून येतंय. दैवी अधिकार कुणाला हे वेळ ठरवेल पण सध्या भाजप विरोधात पर्याय तर उभा करा असं आवाहन सर्व विरोधीपक्षांना या माध्यमातून करण्यात आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT