six people killed in up deoria over property dispute  
देश

Crime News : मृत्यूचे तांडव! जमिनीच्या वादातून 6 जणांची हत्या; एकाचा बदला घेण्यासाठी पाच जणांना संपवलं, परिसरात दहशत

उत्तर प्रदेशातील देवरिया येथे जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

रोहित कणसे

उत्तर प्रदेशातील देवरिया येथे जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या भांडणादरम्यान गोळीबार आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या घटनेत काही लोक जखमीही झाले आहेत. घटनेनंतर तत्काळ परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात असून एसपी, डीएमसह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार देवरिया जिल्ह्यातील रुद्रपूर पोलीस स्टेशन हद्दीतील फतेहपूर गावात ही घटना घडली. येथे राहणारे सत्य प्रकाश दुबे आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेम यादव यांच्यात अनेक दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता. या दोघांमध्ये सतत भांडण होत असत.

मिळालेल्या माहितीनुसार १ ऑक्टोबर रोजी सकाळी प्रेम यादवचा मृतदेह सापडला. धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही हत्या कोणी केली याबाबत माहिती मिळालेली नाहीये. दरम्यान संशयाच्या आधारावर प्रेम यादवच्या संतप्त कुटुंबीयांनी सकाळी साडेसातच्या सुमारास सत्य प्रकाश दुबे यांच्या घरात घुसून गोळीबार केला. यावेळी गोळी लागल्याने कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत्यू झालेल्यांमध्ये सत्य प्रकाश दुबे, त्यांची पत्नी किरण, मुलगी सलोनी, नंदनी आणि मुलगा गांधी यांचा समावेश आहे. आता कुटुंबात फक्त 8 वर्षांचा मुलगा राहिला आहे. हल्लेखोरांनी त्यालाही बेदम मारहाण केली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पाच जणांच्या हत्येत धारदार शस्त्रांचा वापर झाल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान या घटनेशी संबंधित फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

यूपी डीजीपी कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हत्येमध्ये सहभागी असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी काही जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. गावात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी व्यक्त केलं दु:ख

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या. यासोबतच त्यांनी गुन्हेगारांना सोडलं जाणार नाही असेही म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SA W World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याची वेळ बदलली... नवी मुंबईतून समोर आली महत्त्वाची बातमी, जाणून घ्या टॉस कधी

Ganesh Kale Murder: गणेश काळे हत्या प्रकरणात बंडू–कृष्णावर गुन्हा दाखल, आंदेकर गँगचा डाव उघड! पोलिसांनी दिली माहिती

पार्टीला जातोय! रात्री आईला सांगितलं, पहाटे अपघातात चुलत भावांचा मृत्यू; भरधाव वेगात हँडब्रेक ओढला अन् सगळं संपलं

Viral Story: २० रुपयांच्या नाण्यांत जपलेलं प्रेम… नवऱ्याने एका वर्षात बायकोसाठी जमा केलं 'सोनेरी' सरप्राइज! दुकानदारही भावूक

Latest Marathi News Update : परभणीत मुसळधार पावसाने हाहाकार; कापूस नुकसानग्रस्त, रब्बी पेरणी खोळंबली!

SCROLL FOR NEXT