देश

Loksabha 2019 : 'योगी सरकार 'काम रोको'आजाराने ग्रस्त'

वृत्तसंस्था

लखनौ : रस्त्यासाठी सरकार भरमसाट टोलवसुली करीत असताना मात्र सुरक्षितता आणि सुरक्षिततेकडे योगी आदित्यनाथ सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आज समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला. काल मैनपुरी येथे आग्रा-लखनौ महामार्गावरच्या अपघातात सात जण ठार, तर 34 जण जखमी झाले होते. या अपघाताचा संदर्भ घेत अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली. उत्तर प्रदेशात विकासकामे ठप्प झाल्याचाही आरोप त्यांनी केला. 

इटवाह येथे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अपघातग्रस्तांची यादव यांनी भेट घेतली. यानंतर ट्विटरवर अखिलेश यादव यांनी म्हटले, की द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात टोलवसुली केली जात आहे. तरीही त्यावर लक्ष ठेवले जात नाही, पोलिसांची गस्त, सुरक्षित प्रवासासाठी आवश्‍यक खबरदारी न घेणे या कारणामुळे अपघात होत आहेत. राज्यात विकासकामाला चालना मिळत नसून भाजपला सध्या "काम रोको' आजाराने ग्रासले आहे.

आपल्या सरकारच्या काळात अनेक विकासकामे सुरू केली होती. विशेषत: महामार्गावर पोलिस गस्त वाढविणे, महामार्गाची देखभाल करणे आदींसाठी पुढाकार घेतला होता, मात्र आदित्यनाथ सरकारने पुढे काहीच हालचाल केली नाही, असा आरोप अखिलेश यांनी केला. सध्या भाजप काहीच करीत नसून केवळ देशाला अधोगतीकडे नेण्याचे काम करीत आहे. शेतकऱ्यांच्या हितासंबंधीचे प्रश्‍न मार्गी लागलेले नाहीत. त्याचे उत्तर त्यांना लोकसभा निवडणुकीतून मिळेल, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT