Delhi
Delhi Team eSakal
देश

दिल्ली प्रदुषणाला शेतकरी नाही तर कोण जबाबदार? सुप्रीम कोर्टाने म्हटलं...

सुधीर काकडे

राजधानी दिल्लीत सध्या हवा प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावते. प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा नागरिकांना सामना करावे लागत असल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहे. न्यायालयाने आता या मुद्दयावरून दिल्ली सरकारला योग्य पावलं उचलण्यास सांगितले आहे. त्यातच आज सुप्रीम कोर्टात या प्रकरणाव सूनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचं विधान केलं आहे.

पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील धान जाळल्याने हे प्रदूषण होत असल्याची तक्रार केली जाते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने यावर एक महत्वाचं विधान केलं आहे. दिल्लीतील खराब होत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेसाठी शेतकऱ्यांनी जाळलेल्या धानाला पूर्णपणे जबाबदार धरता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी स्पष्ट केलं आहे.

भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमना, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने सांगितले की, वाहनांमधून होणारे उत्सर्जन, फटाके, औद्योगिक उत्सर्जन, धूळ इत्यादी गोष्टी सुद्धा प्रदूषणाची कारणे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India: टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT