taj 
देश

ताज महलमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवाच; नोकरभरती रद्द केल्याच्या रागातून केला प्रताप

सकाळवृत्तसेवा

आग्रा : जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य ताजमहलला आज गुरुवारी अचानकपणे बंद केलं गेलं आहे. ताजमहलमध्ये  बॉम्ब ठेवला असल्याची सूचना मिळाली होती. त्यानंतर CISF च्या जवानांना ताज महलमधील पर्यटकांना बाहेर काढलं आहे. तसेच ताज महलचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन ताज महलमध्ये स्फोटकं ठेवल्याची माहिती दिली होती. सध्या खबरदारी बाळगत संपूर्ण परिसराची तपासणी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मात्र आता एका टीव्ही वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, एका युवकाने ही अफवा मुद्दाम पसरवली असल्याचं स्पष्ट होतंय. यामागचं कारणही तितकंच विचित्र आणि चिंताजनक आहे. नोकरभरती रद्द झाल्याच्या रागातून फिरोजाबादमधील एका युवकाने ही अफवा पसरवल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे त्रस्त असलेल्या एका युवकाने हा प्रताप केल्याचं समजत आहे.

कंट्रोल रुममध्ये आला होता फोन

आर्मी भरतीमध्ये घोळ आहे, आणि माझी भरती झालेली नाहीये. त्यामुळे ताजमहलमध्ये बॉम्ब ठेवला आहे आणि त्याचा लवकरच स्फोट होईल, असं सांगणारा फोन कंट्रोल रुममध्ये आला होता. हा फोन फिरोजाबादमधून आल्याचं स्पष्ट होतंय या दृष्टीने सध्या तपास सुरु असून ही अफवा असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बेरोजगारीच्या मुद्यावरुन सध्या देशात असंतोष आहे. अशा पार्श्वभूमीवर या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी कदाचित या मार्गाचा वापर केला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबतची अधिक सविस्तर माहिती येणे बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराकडे हवनाऐवजी वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT