NV Ramana Sakal
देश

आठवीच्या विद्यार्थिनीने लिहलं सरन्यायाधीशांना पत्र; 'ही' मागणी झाली पूर्ण

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : लहान मुले ही देशाची सर्वांत मोठी ताकद असल्याचं म्हटलं जातं. उद्याचा बलसागर भारत हीच मुले घडवणार असल्यामुळे त्यांच्यावर केलेलं काम हे देशाच्या प्रगतीसाठीच पोषक ठरत असतं. लहान मुलांमध्ये बदल घडवून आणण्याची क्षमचा निश्चितच असते, मात्र आपण ती दुर्लक्षित करतो अथवा ती ओळखायला कमी पडतो. याचीच प्रचिती आणून देणारी एक घटना तेलंगानामध्ये घडली आहे. तेलंगानातील आठवीत शिकणाऱ्या एका मुलीने आपल्या एका समाजोपयोगी मागणीसाठी सरन्यायाधीश एन व्ही रमना यांना पत्र लिहलं आहे. विशेष म्हणजे तिच्या या पत्राचा सकारात्मक परिणाम देखील दिसून आला आहे.

तिच्या गावातील बससेवा कोरोना महासाथीच्या दरम्यान बंद करण्यात आली होती. मात्र, ही बससेवा पूर्ववत करुन होणाऱ्या अडचणींना दूर करावं, अशी विनंती करणारं पत्र या मुलीने सरन्यायाधीशांना लिहलं होतं. टीएसआरटीसीच्या एका प्रेस रिलीजमध्ये बुधवारी याबाबत माहिती देताना सांगण्यात आलं की, या पत्रानंतर सरन्यायाधीशांद्वारे सूचना देण्यात आल्यानंतर तेलंगाना राज्य रस्ते परिवहन मंडळ अर्थात टीएसआरटीसीने रंगा रेड्डी जिल्ह्यातील या गावात बस सेवा पूर्ववत केली आहे. या जिल्ह्यातील चिदेदु गावात राहणाऱ्या पी वैष्णवीने सरन्यायाधीशांना गावात बससेवा बहाल करण्यासंदर्भात पत्र लिहलं होतं. तिने आपल्या पत्रात लिहलं होतं की, तिच्या गावात बसची सुविधा नाहीये. त्यामुळे तिच्या भाऊ-बहिणींना शाळा आणि कॉलेजला जाण्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागतो.

बससेवा नसल्याने तिच्या मित्र-मैत्रिणींना तसेच इतर गावकऱ्यांना त्रासाचा सामना करावा लागतो आहे. प्रवासासाठी ऑटोरिक्षाचा पर्याय निवडून अधिक खर्च करणे व्यवहार्य नाहीये. तसेच कोरोना महासाथी दरम्यान तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे आणि तिची आई कमी वेतनामध्ये काम करते. तिच्या या पत्राच्या उत्तरामध्ये, सरन्यायाधीशांनी टीएसआरटीसीचे एमडी व्ही सी सज्जनार यांना मुलांच्या शिक्षणाच्या अधिकाराचा सन्मान करण्यासाठी बससेवा बहाल करण्यासाठीचा आदेश दिला. तसेच या मुलीच्या या प्रयत्नाचं कौतुक केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT