Amit shaha
Amit shaha sakal
देश

भाजपचे सरकार गोरगरीबांसाठी काम करणारे सरकार

सकाळ वृत्तसेवा

लखनौ : भाजपचे सरकार गरिबांतील गरिबांसाठी काम करत असल्याचे आम्ही सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘माझा परिवार-भाजप परिवार’ या मोहिमेचे उद्‌घाटन शहा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी, ते बोलत होते. शहा म्हणाले, की भाजपने उत्तर प्रदेशला पुन्हा ओळख मिळवून दिली आहे. उत्तर प्रदेशला देशातील सर्वाधिक आघाडीवरील राज्य करण्यासाठी भाजपने खूप कष्ट घेतले. सरकार केवळ एखाद्या घराण्यासाठी नसते तर ते राज्यातील गरिबांतील गरिबांसाठी असते, हे भाजपने सिद्ध केले, असा टोलाही त्यांनी काँग्रेसचे नाव न घेता लगावला. गेली पाच वर्षे घरात बसून राहिलेले लोक आता घराबाहेर येऊन सरकार स्थापण्याचा विचार करत आहेत, असा टोमणाही त्यांनी मारला.काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उल्लेख न करत शहा पुढे म्हणाले, की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपण परदेशात किती दिवस होतो. कोरोना साथीत व पुरात कोठे होतो, हे सांगावे. विरोधक केवळ आपल्या कुटुंबासाठी काम करतात.

‘राम मंदिराची निर्मिती अभिमानास्पद’
योगी आदित्यनाथ म्हणाले, की केंद्रात तसेच उत्तर प्रदेशात भाजप विजयी होण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक अडथळ्यांवर मात केली. त्यांनी दंगलींचाही सामना केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशात राम मंदिराची निर्मिती होत आहे, याचा प्रत्येकाला अभिमान आहे. यंदा संपूर्ण जग अयोध्येतील दीपोत्सवचा लखलखाट पाहील, असेही त्यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT