देश

कोरोनातून बरे झालेल्यांंचं लशीकरण कधी? आरोग्य मंत्रालयाने केलं स्पष्ट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर वाढतोच आहे. दररोज सुमारे साडेतीन लाखहून अधिक रुग्ण देशामध्ये आढळून येत आहेत. तर दुसरीकडे देशातील लशीकरणाची प्रक्रिया देखील गतीने सुरु आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न सध्या लोकांच्या मनात आहेत. त्यातीलच एक प्रश्न म्हणजे कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर त्यातून बरे झालेल्या लोकांना लस कधी दिली जाईल? या संदर्भात आता सरकारकडून उत्तर देण्यात आलं आहे. सरकारने म्हटलंय की, कोरोनाची लक्षणे पूर्णपणे समाप्त झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्यांनंतर कोरोनाची लस दिली जाऊ शकते.

लोकांनी विचारला हा प्रश्न

मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जाहीर केली आहेत. या अंतर्गत लोक विचारत होते की, कोरोनाच्या संक्रमणातून मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये रिकव्हरीनंतर कोरोनाचे लशीकरण करणे कधी योग्य ठरेल? लोकांचं म्हणणं होतं की, कोरोना संक्रमणाची हिस्ट्री असणाऱ्या रोग्यांना देखील कोरोना प्रतिबंधक क्षमता निर्माण होण्यासाठी कोरोना लशीकरणाची आवश्यकता आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलं उत्तर

या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आरोग्य मंत्रालयाने म्हटंलय की, सध्या कोरोना संक्रमणानंतर रोग प्रतिकारक शक्तीच्या विकासासाठीची माहिती तसेच सुरक्षित काळ प्रमाणित नाहीये. अशात कोरोना रुग्णांची लक्षणे समाप्त झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्यानंतर कोरोनाची लस दिली जाऊ शकते. मात्र, आरोग्य मंत्रालयाने हे स्पष्ट केलं नाहीये की, जर एखादी व्यक्ती कोरोना संक्रमित असेल अथवा तिच्यात लक्षणे असतील तर तिला लस दिली जाऊ नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूज इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT