देश

कोरोनातून बरे झालेल्यांंचं लशीकरण कधी? आरोग्य मंत्रालयाने केलं स्पष्ट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर वाढतोच आहे. दररोज सुमारे साडेतीन लाखहून अधिक रुग्ण देशामध्ये आढळून येत आहेत. तर दुसरीकडे देशातील लशीकरणाची प्रक्रिया देखील गतीने सुरु आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न सध्या लोकांच्या मनात आहेत. त्यातीलच एक प्रश्न म्हणजे कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर त्यातून बरे झालेल्या लोकांना लस कधी दिली जाईल? या संदर्भात आता सरकारकडून उत्तर देण्यात आलं आहे. सरकारने म्हटलंय की, कोरोनाची लक्षणे पूर्णपणे समाप्त झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्यांनंतर कोरोनाची लस दिली जाऊ शकते.

लोकांनी विचारला हा प्रश्न

मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जाहीर केली आहेत. या अंतर्गत लोक विचारत होते की, कोरोनाच्या संक्रमणातून मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये रिकव्हरीनंतर कोरोनाचे लशीकरण करणे कधी योग्य ठरेल? लोकांचं म्हणणं होतं की, कोरोना संक्रमणाची हिस्ट्री असणाऱ्या रोग्यांना देखील कोरोना प्रतिबंधक क्षमता निर्माण होण्यासाठी कोरोना लशीकरणाची आवश्यकता आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलं उत्तर

या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आरोग्य मंत्रालयाने म्हटंलय की, सध्या कोरोना संक्रमणानंतर रोग प्रतिकारक शक्तीच्या विकासासाठीची माहिती तसेच सुरक्षित काळ प्रमाणित नाहीये. अशात कोरोना रुग्णांची लक्षणे समाप्त झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्यानंतर कोरोनाची लस दिली जाऊ शकते. मात्र, आरोग्य मंत्रालयाने हे स्पष्ट केलं नाहीये की, जर एखादी व्यक्ती कोरोना संक्रमित असेल अथवा तिच्यात लक्षणे असतील तर तिला लस दिली जाऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT