वीज  esakal
देश

पंजाबमध्ये भारनियमनाचा त्रास, दररोज तीन तास बत्ती होणार गुल

सकाळ वृत्तसेवा

Punjab Power Cuts : कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे पंजाबमधील वीज संकट आधिकच गडद होत चाललं आहे. 13 ऑक्टोबरपर्यंत राज्यात दरररोज सरासरी तीन तास वीज कपात होईल. लोकांनी वीज वापर कमी करावी, अशी विनंती राज्य सरकारने केली आहे. कोळशाच्या टंचाईमुळे रविवारी पंजाबमधील एक औष्णिक विद्युत केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे राज्यातील वीज उत्पादन अर्ध्यावर आले आहे. सध्या खासगी औष्णिक विद्युत केंद्राकडे केवळ 36 तास पुरेल इतकाच कोळसा शिल्लक राहिला आहे.

पंजाबमध्ये वीज संकट गडद होत असतानाच पंजाबमधील सरकारी औष्णिक विद्युत केंद्रासाठी 11 रॅक कोळसा रवाना करण्यात आला. हा कोळसा प्रकल्पापर्यंत पोचण्यासाठी एक दोन दिवस लागणार आहेत. सध्या पंजाबमध्ये सुरू असलेल्या वीज प्रकल्पात निम्मीच वीज तयार होत आहे. त्यामुळे पंजाबच्या नागरिकांना 13 ऑक्टोबरपर्यंत चार ते सहा तासाच्या भारनियमनाचा त्रास सहन करावा लागणार आहे.

विजेची टंचाई जाणवत असल्यामुळे पंजाबमध्ये काही तासांसाठी भारनियमन लागू केले जात आहे. जालंधरमध्ये रविवारी दिवसभरात दोनदा सहा-सहा तासांचे भारनियमन करण्यात आले. या काळात शहरात वीजपुरवठा ठप्प होता. अन्य जिल्ह्यांत चार तासांपर्यंत वीज कपात केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT