देश

Tirupati Laddu Controversy: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये चरबी कोण मिसळत होतं? अमित शाहांना लिहिलं पत्र

YS Jagan Mohan Reddy: सत्तारुढ तेलुगू देसम पक्षाने केलेल्या दाव्यानुसार गुजरातमधील एका लॅबने याबाबतची पुष्टी केली आहे. टीडीपीचे प्रवक्ते अनम व्यंकट रमणा रेड्डी यांनी १९ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन हा लॅबचा रिपोर्ट सार्जनिक केला.

संतोष कानडे

नवी दिल्लीः आंध्र प्रदेशातल्या जगप्रसिद्ध तिरुपती देवस्थानच्या लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरुन देशात वाद उभा राहिला आहे. तेलुगू देसम पक्षाने लॅब रिपोर्टच्या आधारे जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर आरोप केले आहेत. टीडीपीने केलेल्या दाव्यांनुसार वायएसआरसी सरकारच्या कार्यकाळामध्ये तिरुमला मंदिर ट्रस्टला लाडू बनवण्यासाठी ज्या तुपाचा पुरवठा करण्यात आला होता, त्यात जनावराची चरबी आणि माशांचं तेल मिसळल्याचं आढळून आलं आहे.

सत्तारुढ तेलुगू देसम पक्षाने केलेल्या दाव्यानुसार गुजरातमधील एका लॅबने याबाबतची पुष्टी केली आहे. टीडीपीचे प्रवक्ते अनम व्यंकट रमणा रेड्डी यांनी १९ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन हा लॅबचा रिपोर्ट सार्जनिक केला. त्यांनी म्हटलं की, गुजरात येथील लाईव्हस्टॉक लॅबोरेटरी NDDB (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड) CAFL लिमिटेड (सेंटर फॉर एनालिसिस अँड लर्निंग इन लाईव्हस्टॉक अँड फूड) यांना ९ जुलै २०२४ रोजी सॅम्पल पाठवण्यात आलेलं होतं. लॅबने १७ जुलै रोजी आपला रिपोर्ट दिला होता.

याच मुद्द्यावरुन तिरमला तिरुपती देवस्थानचे माजी अध्यक्ष आणि वायएसआर पक्षाचे खासदर वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी सांगितलं की, तिरुपती लाडू प्रसादाच्या पावित्र्यावरुन मुख्यमंत्री नायडू यांचं विधान अत्यंत खेदजनक आहे. यामुळे जगभरातील हिंदूंच्या भावनांना धक्का बसला आहे. टीटीडीने २०१९ पासून २०२४ पर्यंत नैवेद्य आणि प्रसाद करण्याचं सर्वोच्च मानकांचं पालन केलं आहे. पूर्वीपेक्षा आता प्रसादाची गुणवत्ता सुधारली आहे.

अमित शाहांना पत्र

या प्रकरणाच्या चौकशीसाठी वकील विनित जिंदल यांनी केंद्रीय गृह मंत्रालय आणि आंध्र प्रदेशचे पोलिस प्रमुख यांच्याकडे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यासह तिरुमला तिरुपती देवस्थान अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. यासह तुपामध्ये जनावरांची चरबी मिसळणाऱ्या ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे.

वकील जिंदल यांनी आपल्या तक्रारीत या सर्व प्रकरणात भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS चे कलम १५२, १९२, १९६, २९८ आणि ३५३ नुसार एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. सोबत जगन मोहन रेड्डी आणि इतरांविरोधात राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमानुसार करवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दुसरीकडे जगन मोहन रेड्डी आणि त्यांचा पक्ष वायएसआर काँगेसने या प्रकरणी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली. वायएसआर काँग्रेसने हायकोर्टाकडे एन. चंद्राबाबू नायडू आणि टीडीपीच्या आरोपांच्या चौकशीसाठी ज्यूडिशियल कमिटी स्थापन करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी २५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle: संगीतविश्वातील सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत!

IPL 2026, LSG vs GT: शुभमन गिलने जिंकला टॉस; गुजरात - लखनौच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय झाले बदल?

Asha Bhosle Favorite Leader : आशा भोसलेंचा आवडता नेता कोण? भारदस्त आवाज असणारा नेता अत्यंत जिवलग मित्र...

Leopard attack Jalgaon : जळगावमध्ये बिबट्याची दहशत; आमदार चंद्रकांत पाटील जखमी, तीन तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद

फक्त संगीतातच नाहीतर पाककलेत सुद्धा अव्वल होत्या आशा भोसले, जगभरात रेस्टॉरंट आणि...

SCROLL FOR NEXT