ramdas boat Titanic Tourist Submarine esakal
देश

Ramdas Boat Accident : 'प्रेतं तरंगल्याने लागला पत्ता...' कसा झाला होता रामदास बोटीचा अपघात ?

७४२ जणांना घेऊन जाणारी रामदास बोट वादळात सापडून बुडाली.

धनश्री भावसार-बगाडे

Titanic Tourist Submarine And Ramdas Boat : रविवारी टायटॅनिक च्या अवशेषांना भेट देण्यासाठी गेलेल्या पाणबुडीचा “भयंकर स्फोट ” झाला, ज्यात जहाजावरील सर्वांचा मृत्यू झाल्याचं तपासात समोर आलं. या घटनेशी साधर्म्य साधारणारी अशीच एक दुर्दैवी घटना जुलै १९४७ मध्ये घडली होती. ७४२ जणांना घेऊन जाणारी रामदास बोट वादळात सापडून बुडाली.

टायटन सबमरीन घटना

ओशियन गेट या पर्यटन कंपनीच्या एका छोट्या पाणबुडीमधून पाच अब्जाधीश टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहायला गेले होते. रविवारी टायटन या सबमरीन मधून हे अटलांटिक महासागराच्या तळाशी जात होते. मात्र, काही तांत्रिक बिघाडामुळे या पाणबुडीचा आणि त्यासह त्यातील सर्वांचा संपर्क तुटला. यानंतर बेपत्ता झालेल्या या सर्वांचा शोध सुरू करण्यात आला होता. दुर्दैवाने ओशियन गेटने या पाणबुडी मधले सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत असे आपल्या अधिकृत स्टेटमेंट मध्ये जाहीर केले. यात अब्जाधिश प्रवासी प्रवास करत होते.

रामदास बोट घटना

रामदास बोटीचा अपघात हा मुंबईकरांसाठी, वाचलेल्या प्रवाशांसाठी आजही थरकाप भरवणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे.

बॉम्बे स्टीम नॅव्हिगेशन कंपनीच्या ७४२ जणांच्या प्रवासी बोटीला १९४७ मध्ये मोठा अपघात झाली. ही बोट वादळात सापडूव बेपत्ता झाली होती. यात ७४२ प्रवाशांपैकी केवळ ७४ प्रवासी बचावले.

या घटनेचे त्यावेळी मोठ्या प्रमाणात राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटल्याचे त्यावेळी छापून आलेल्या वृत्तांतून समोर येते. या घटनेमुळे मुंबईत आणि विशेषतः बॉम्बे स्टीम नॅव्हिगेशन कंपनीत मोठी खिन्नता पसरली होती.

बोटीतील प्रवाशांच्या नातेवाईकांनी कंपनीचे ठाकूरद्वार आणि भाऊधक्क्याला गराडा घातला होता. रेस्क्यु ऑपरेशन नंतर सापडलेल्या जिवंत लोकांची यादी समजल्याने त्यानंतर बराच काळ नातेवाईक साश्रू नयनांनी कार्यालयात आपले कोणी सापडले का, याची चौकशी करत होते.

प्रेतं तरंगल्याने लागला पत्ता

बोट वेळेत न परतल्याने बंदरावर सगळे जण चिंतेतच होते. तोच ससून डॉकजवळ ४ प्रेतं तरंगत असल्याचा फोन आला. मासेमाऱ्यांना ही प्रेतं आढळली होती. मग बंदरावर प्रसंगाचं गांभीर्य लक्षात आल्याने धावपळ सुरू झाली.

दुसरी बोट पाठवण्यात आली. तीने समुद्रात तरंगणारे ८ प्रवासी वाचवून आणले. पण या वाचवलेल्या प्रवाशांसाठी या प्रसंगाने मोठा धक्का बसला. काहींचे संपूर्ण आयुष्यभराची कमाई, कुटुंबच या संपले तो एकटा व्यक्ती वाचला.

काहींनी डोळ्यासमोर बहिणीला, मुलाला, कुटुंबाला वाहून जाताना पाहिले. या वाचलेल्या लोकांमध्ये एक १२ वर्षांचा मुलगा होता, तो समुद्रात तरंगत होता.

या आधीही झाल्या होत्या अशा घटना

रामदास बोटीची घटना त्याकाळातील सर्वात मोठी घटना होती. त्यापूर्वी साधारण २० वर्षे आधी तुकाराम व जयंती या बोटींचा असा मोठा अपघात झाला होता, असे त्यावेळच्या वृत्तांमधून समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT