Kranti Din  esakal
देश

Kranti Din : मुंबई मधील 'ऑगस्ट क्रांती' मैदान अन् भारतातील ऐतिहासिक दिनाचं महत्व

९ ऑगस्ट १९४२ रोजी चळवळीस सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधीसह कॉग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला.

साक्षी राऊत

Kranti Din : ८ ऑगस्ट १९४२ साली कॉग्रेसच्या मुंबई अधिवेशनात महात्मा गांधींनी 'भारत छोडो' आंदोलन सुरु केले. गांधीनी देशाला संबोधताना त्यांच्या भाषणात 'करो या मरो' चे आवाहन केले. भारतातील ब्रिटीशांची सत्ता संपवण्यासाठी ही सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली होती. भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात झाल्यामुळे याला 'ऑगस्ट चळवळ' किंवा 'ऑगस्ट क्रांती' असेही म्हणतात.

९ ऑगस्ट १९४२ रोजी चळवळीस सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधींसह कॉग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अटकेनंतर अरुणा असफ अली यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे नेतृत्व केले. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी '९ ऑगस्ट' हा ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली वाहून तसेच देशाच्या एकतेची भाषणे आणि इतर कार्यक्रमाद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

भारत छोडो आंदोलनाच्या सुरुवातीला महात्मा गांधीनी गोवालीया टॅक येथून भाषण दिल्याने या मैदानाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी देशाला आवाहन करण्यासाठी महात्मा गांधी आणि कॉग्रेसचे इतर नेते ८ आॉगस्ट १९४२ आणि ९ आॉगस्ट १९४२ रोजी या ठिकाणी एकत्र जमले होते.या ऐतिहासिक क्षणांची आठवण करुन देणाऱ्या स्मारकाची उभारणी या मैदानावर केली गेली आहे.मध्य मुंबईमध्ये स्थित असलेले गोवालिया मैदान हे गाई आणि इतर प्राणी स्वच्छ करण्यासाठी वापरले जायचे. 'गो' म्हणजे गाई आणि 'वाला' म्हणजे त्यांचा मालक ,म्हणून याचे नाव गोवालिया असे पडले.

सध्या याचे रुपांतर पाच विभागणी असलेल्या मोठ्या मैदानात झाले आहे.एक विभाग हा शहीदांच्या स्मारकांचा आहे.सगळ्यात मोठा भाग म्हणजे खुले खेळाचे मैदान त्याचबरोबर जेष्ठ नागरिकांसाठी गार्डन आणि लहान मुलांसाठी छोटेसे खेळाचे मैदान आहे. गांधी ज्या मणीभवनाचा वापर मुख्यालय म्हणून करत होते त्यापासून जवळच हे मैदान आहे. हे मैदान भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तसेच एका महत्वाच्या ऐतिहासिक क्षणाचा भाग आहे परंतु दुर्दैवाने प्रवाशांना माहीती देणाऱ्या पुस्तकात त्याचा उल्लेख नाही. क्रांती दिन हा भारताच्या इतिहासातला एक फार महत्वाचा दिवस आहे. (Kranti Din)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT