mirzapur model yogi adityanath

 

esakal

देश

Yogi Adityanath: मिर्झापूर मॉडेलची देशभर चर्चा! योगी सरकारने वीज कोसळण्याच्या मृत्यूंवर कसा लगाम घातला?

Mirzapur Model: योगी सरकारच्या धोरणामुळे वीज कोसळण्याच्या मृत्यूंमध्ये ५०% घट

CD

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्हा, जो एकेकाळी वीज कोसळून होणाऱ्या मृत्यूंचे 'हॉटस्पॉट' मानला जात असे, तिथे आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विशेष धोरणामुळे एक मोठी सकारात्मक क्रांती घडून आली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि जनजागृतीच्या जोरावर मिर्झापूरमध्ये वीज कोसळून होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण तब्बल ५० टक्क्यांनी घटले आहे.

एकेकाळी मिर्झापूरची भौगोलिक रचना आणि तिथले खाणकाम क्षेत्र यामुळे येथे दरवर्षी पावसाळ्यात आकाशीय वीज पडून अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत असत. २०१9 ते २०२२ या काळात दरवर्षी सरासरी २५ ते ३० मृत्यूंची नोंद होत होती. मात्र, योगी सरकारने हे मृत्यू रोखण्यासाठी 'लाइटनिंग रेझिलियन्सी मॉडेल' (Lightning Resiliency Model) राबवण्याचा निर्णय घेतला. या अंतर्गत वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून जिल्ह्यातील वीज कोसळणाऱ्या अतिसंवेदनशील ठिकाणांचा (Hotspots) नकाशा तयार करण्यात आला.

आयआयटी (IIT) रुरकी आणि आयआयटी एम (IITM) पुणे यांसारख्या नामवंत संस्थांच्या मदतीने मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ८० अशा जागा निश्चित करण्यात आल्या जिथे वीज पडण्याचा सर्वाधिक धोका होता. या ठिकाणी आधुनिक 'अर्ली स्ट्रीमर एमिशन' (ESE) तंत्रज्ञानावर आधारित लाइटनिंग अरेस्टर बसवण्यात आले. हे उपकरण आकाशीय विजेला सुरक्षितपणे ओढून घेते आणि जमिनीत प्रवाहित करते, ज्यामुळे आसपासच्या परिसरात होणारी जीवितहानी टळते. या उपकरणांनी अनेकदा वीज यशस्वीरीत्या शोषून घेतल्याचे पुरावेही समोर आले आहेत.

केवळ उपकरणे लावून सरकार थांबले नाही, तर या मॉडेलमध्ये लोकसहभागालाही महत्त्वाचे स्थान देण्यात आले. 'दामिनी' (Damini) मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिकांना विजेची पूर्वसूचना कशी मिळेल, याचे प्रशिक्षण ग्रामपंचायतींमार्फत देण्यात आले. खेड्यापाड्यांत दवंडी पिटून, पोस्टर्स लावून आणि अगदी सिनेमागृहांमध्ये जनजागृतीपर चित्रफिती दाखवून वीज पडत असताना सुरक्षित कसे राहावे, याची माहिती पोहोचवण्यात आली.

या सर्वांचा परिणाम असा झाला की, २०२४ पासून मिर्झापूरमधील मृत्यूंचा आकडा १४ पर्यंत खाली आला आहे. जो जिल्हा कधी काळी मृत्यूच्या छायेखाली असायचा, तो आज वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे सुरक्षित होत आहे. हे 'मिर्झापूर मॉडेल' आता देशातील इतर राज्यांसाठीही एक आदर्श उदाहरण ठरत आहे, जिथे तंत्रज्ञान आणि प्रशासन यांच्या समन्वयाने नैसर्गिक आपत्तीवर मात करणे शक्य झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT