Virat Kohli Amrinder singh and Vijay rupani Resigned  Team eSakal
देश

राजकारण ते खेळाच्या मैदानात राजीनाम्याने भूकंप; आठवड्यात तिघांनी सोडलं नेतृत्व

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री हे देखील राजीनामा देणार असल्याची शक्यता आहे.

सुधीर काकडे

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, राजीनामा देणारे अमरिंदर सिंग हे गेल्या एका आठवड्यातील दुसरे मुख्यमंत्री आहेत. त्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी 11 सप्टेंबरला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. गुजरातमधील राजकीय भुकंपाची देशभरात चर्चा सुरु असतानाच, 5 दिवसांनंतर म्हणजेच गुरुवारी विराट कोहलीने टी -20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा करून सर्वांनाच मोठा धक्का दिला. राजकारणापासून क्रीडाक्षेत्रातील या राजीनाम्यांनी देशात भूकंप केला आहे.

विजय रुपाणी यांचा राजीनामा

राजीनाम्यांची मालिका विजय रुपाणी यांच्यापासून सुरू केली. त्यांनी 11 सप्टेंबर रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि गुजरातमध्ये खळबळ उडाली. रुपाणी यांनी आपल्या पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या एक वर्षापूर्वीच पद सोडले. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच त्यांनी घेतलेल्य या निर्णयाने, भाजपमधील अंतर्गत राजकारण समोर आले.

कोहलीनेही दिला राजीनामा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. 16 सप्टेंबर ट्विटरच्या माध्यमातून टी -20 फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि क्रिकेट विश्वात खळबळ माजली. टी -20 विश्वचषकापर्यंतच तो संघाचा कर्णधार राहील, असे म्हणत विराटने राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट केले. महेंद्रसिंग धोनीनंतर 2017 मध्ये विराट कोहलीला टी -20 चे कर्णधार बनवण्यात आलं होतं. तो 4 वर्ष या पदावर राहिला. त्यानं 45 टी -20 मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले, त्यापैकी 27 सामन्यांत संघाला विजय मिळाला. विराट कोहलीने कर्णधार म्हणून 45 सामन्यांत 1502 धावा आणि अर्धशतकं केली.

पंजाबच्या कॅप्टनने राजीनामा दिला

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर दोन दिवसांनी पंजाबच्या कॅप्टनने अर्थात कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपले पद सोडले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आले. राज्यपालांकडे राजीनामा सादर केल्यानंतर राजभवनाबाहेरच्या माध्यमांना संबोधित करताना कॅप्टन म्हणाले की, गेल्या काही दिवसांत तिसऱ्यांदा असे घडले आहे. यामुळे त्याला अपमानित वाटू लागते. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनाही याबाबत माहिती दिली होती असे त्यांनी यावेळी सांगितले होते. गेल्या काही महिन्यांपासून पंजाब काँग्रेसमध्ये गोंधळ सुरू होता. प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचा गट अमरिंदर सिंग यांच्या गटावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत होता.

अमरिंदर सिंग यांच्यासह तीन दिग्गजांनी एकाच आठवड्यात राजीनामा दिला. दरम्यान, या तीन राजीनाम्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री हे देखील राजीनामा देणार असल्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : दहा वर्षे प्रेमसंबंध, ब्रेकअपनंतर भेटायला बोलावून भररस्त्यात प्रेयसीची हत्या, स्वत:लाही संपवलं

Yellow Rain Kolhapur : काय सांगता! कोल्हापूरच्या कागल परिसरात चक्क पिवळा पाऊस, सोशल मीडियावर Video Viral

AUS vs IND, 3rd ODI: भारताच्या Playing-XI मध्ये कुलदीप यादवला संधी, पण नितीश रेड्डीच्या न खेळण्याचं खरं काय कारण? BCCI कडून खुलासा

Whatsapp Storage Feature : स्टोरेज सतत फूल होतंय? व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं जबरदस्त फीचर; एका क्लिकमध्ये मॅनेज करता येणार मोबाईलचा स्पेस

Healthy Life: फक्त सकाळी जिम अन् डाएट करणे पुरेसे नाही, तर हृदयरोगतज्ज्ञांच्या मते 'या' गोष्टींही ठेवल्या पाहिजे लक्षात

SCROLL FOR NEXT