Rahul Gandhi vs Annie Raja 
देश

Wayanad Lok Sabha Election Results: वायनाड काँग्रेससाठी सुरक्षितच; राहुल गांधींचा मोठ्या मताधिक्क्यांनी विजय

Wayanad constituency 2024 Election Results Rahul Gandhi Winner: भाजपचे उमेदवार के सुरेंद्रन यांनी राहुल गांधी यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. पण, खरी लढत ही राहुल गांधी विरुद्ध कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (CPI) एनी राजा यांच्यामध्येच झाली. (CPI Annie Raja)

कार्तिक पुजारी

Wayanad election results Rahul Gandhi won: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा मतदारसंघ असल्यामुळे देशाचे लक्ष वायनाड लोकसभा मतदारसंघाकडे लागले होते. याठिकाणी मोठ्या मताधिक्क्यांनी राहुल गांधी यांचा दुसऱ्यांदा विजय झाला आहे. राहुल गांधी यांना जवळपास अडीच लाखांनी अधिक मत घेऊन विजय नोंदवला आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधींचा या ठिकाणी सहज विजय झाला होता. वायनाड हा काँग्रेससाठी सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. त्यामुळे पुन्हा एकदा याठिकाणी राहुल बाजी मारतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरलं होतं. केरळमधील या प्रसिद्ध शहराची स्थापना १९८० मध्ये झाली होती. वायनाड हे नाव 'वायल नाडू' वरुन पडलं आहे. याचा अर्थ इंग्रजीमध्ये भाताची भूमी असा होता.

वायनाडमध्ये एकूण सात विधानसभा मतदारसंघ येतात. भाजपचे उमेदवार के सुरेंद्रन यांनी राहुल गांधी यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. पण, खरी लढत ही राहुल गांधी विरुद्ध कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (CPI) एनी राजा (Annie Raja) यांच्यामध्येच झाली. सीपीआयच्या एनी राजा यांनी विकासाच्या मुद्द्यावरून प्रचारात जोर लावला होता. राहुल गांधी यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने या मतदारसंघाचा निकाल पाहणं औत्सुक्याचं ठरलं होतं.

२०१९ मधील काय होती स्थिती?

राहुल गांधी यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ७, ०६, ३६७ मतं मिळाली होती. राहुल गांधी यांनी सीपीआयचे उमेदवार पीपी सुन्नेर ( PP Suneer) यांचा दारुण पराभव केला होता. त्यांना २.७ लाख मतं मिळाली होती. वायनाडमध्ये यावेळी ७२.६९ टक्के मतदान झालं. तसं पाहिलं तर देश पातळीवर सीपीआय इंडिया आघाडीचा भाग आहे. पण, केरळमध्ये सीपीआयने सर्व २० लोकसभा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार काँग्रेस विरोधात उभे केले होते.

काँग्रेससाठी सुरक्षित मतदारसंघ

विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये राहुल गांधी हे विजयी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण, त्यांच्या मतांना टक्का कमी होईल असं सांगण्यात आलं होतं. राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील रायबरेली या मतदारसंघातूनही मैदानात होते. २००९ आणि २०१४ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या एम आय शनवास( M I Shanavas) यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळेच हा काँग्रेससाठी सुरक्षित मतदारसंघ असल्याचं म्हटलं जातं. म्हणूनच भाजपने याठिकाणी सुरुंग लावण्यासाठी प्रयत्न केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT