Wayanad Landslide Deaths Esakal
देश

Wayanad Landslide Deaths: वायनाड भूस्खलनात मृतांची संख्या 340 वर; 40 दिवसांच्या चिमुकलीला बचाव पथकाने वाचवले

Kerala Landslide: यादरम्यान, पाण्याच्या जोरदार प्रवाहात हयान अचानक वाहून गेला. हयान 100 मीटर दूर गेला आणि विहिरीजवळून जाणाऱ्या वायरला लटकला त्यानंतर बचाव पथकाने त्याला वाचवले.

आशुतोष मसगौंडे

वायनाडमध्ये भूस्खलन होऊन आता पाच दिवस झाले असून अजूनही पीडितांचा शोध सुरूच आहे. आतापर्यंत बचाव पथकांना 340 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. दरम्यान, अजूनही सुमारे 200 लोक अद्याप बेपत्ता आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 210 मृतदेह आणि 134 शरीराचे अवयव सापडले असून, त्यात 96 पुरुष, 85 महिला आणि 29 लहान मुलांचा समावेश आहे.

आतापर्यंत 146 मृतदेहांची ओळख पटलेली आहेत. प्रशासनाने घटनास्थळावरच 207 मृतदेह आणि 134 अवयवांचे शवविच्छेदन पूर्ण केले आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वायनाड, कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यातील 84 लोकांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर 187 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. घटनास्थळावरून 273 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वायनाड भूस्खलनात ४० दिवसांच्या मुलीची सुटका

वायनाड भूस्खलनात ४० दिवसांची मुलगी आणि तिच्या सहा वर्षांच्या भावाला बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे.

केरळमधील वायनाड येथील भूस्खलनात एकाच कुटुंबातील सहा जण पुरात वाहून गेले. त्याचे घरही उद्ध्वस्त झाले. कुटुंबातील ४० दिवसांची मुलगी अनारा आणि तिचा सहा वर्षांचा भाऊ मोहम्मद हयान सुखरूप बचावले.

बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, अनारा आणि हयानला वाचवण्यासाठी त्यांची आई तंजिरा घराच्या छताला लटकून राहिली.

यादरम्यान, पाण्याच्या जोरदार प्रवाहात हयान अचानक वाहून गेला. हयान 100 मीटर दूर गेला आणि विहिरीजवळून जाणाऱ्या वायरला लटकला त्यानंतर बचाव पथकाने त्याला वाचवले.

या दुर्घटनेनंतर केंद्र सरकारही एक्शन मोडवर आले आहे. केंद्राने पश्चिम घाटातील सुमारे 56,800 चौरस किलोमीटरचा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी मसुदा अधिसूचना जारी केली आहे.

या क्षेत्रात वायनाडची १३ गावे आणि केरळ राज्यातील अंदाजे १०,००० चौरस किलोमीटरचा समावेश आहे. या मसुद्यात पश्चिम घाटातील ३६ टक्के भाग पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आहे.

वायनाडमधील भीषण दुर्घटनेसाठी अनियंत्रित औद्योगिकरणाला जबाबदार धरण्यात आले आहे. सहा राज्यांमध्ये पसरलेल्या पश्चिम घाटाच्या क्षेत्रांना पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया 2013 पासून सुरू आहे.

पश्चिम घाट हे गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि इतर अनेक नद्यांचे उगमस्थान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT