amit-shah 
देश

पश्‍चिम बंगालमध्ये पुढील सरकार भाजपचेच असेल : अमित शहा

पीटीआय

नवी दिल्ली - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केवळ त्यांच्या भाच्यासाठीच काम करीत असून विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांच्या बाजूने कोणीही नसेल, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केली. 

पश्‍चिम बंगालमधील डमरजुला स्टेडिअम येथे  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची सभा झाली. त्यात शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या (टीएमसी) ‘मा माटी, मानुष’ या घोषणेचा खरा अर्थ पिळवणूक, भ्रष्टाचार आणि लांगूलचालन असा असल्याचे सांगून बंगालमध्ये पुढील सरकार भाजपचेच असेल आणि राज्यात विकासाचा मार्ग खुला होईल, असा विश्‍वास शहा यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘निवडणुकीनंतर बंगालमध्ये भाजपचीच सत्ता येणार आहे. मोदी सरकार जनकल्याणासाठी काम करीत असताना ममता बॅनर्जी सरकार ‘भतिजा कल्याणा’साठी काम करीत आहेत.’’ 

ममता अपयशी
‘टीएमसी’चे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत, त्याबद्दल ममता बॅनर्जी यांची आत्मपरीक्षण करावे, असा खोचक सल्ला शहा यांनी दिला. ‘‘त्या राज्यातील जनतेसाठी अपयशी ठरल्या आहेत, हे याचे कारण आहे. निवडणुकीपर्यंत त्या एकट्या पडणार आहेत,’’ असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking News : वडिलांनी शेत विकून घर बांधायला ठेवले १४ लाख, १३ वर्षांच्या मुलाने ऑनलाईन गेममध्ये गमावले अन्... धक्कादायक घटनेने सगळेच हादरले

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

हिंदूंची जमीन मुस्लिमांच्या नावे केल्याचे आरोप, महिला अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छापे; ९० लाखांची रोकड अन् कोट्यवधींचं सोनं जप्त

Latest Marathi News Updates : ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल!

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

SCROLL FOR NEXT