देवगड : तालुक्याच्या किनारी भागात पावसाची हुलकावणी आहे. अमावास्या असल्याने पाऊस कोसळेल, असा शेतकऱ्यांचा पारंपरिक ठोकताळा होता. मात्र, दिवसभरात पाऊस तर झालाच नाही, उलट कडक उन्हाचे चटके बसत होते. दरम्यान, पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. किनारी भागात मॉन्सूनचा प्रवेश झाला खरा; मात्र त्यामध्ये सातत्य नसल्याने हवेतील उष्णता कायम आहे. गेले काही दिवस पावसाची हुलकावणी आहे. त्यामुळे उष्णतेत मोठी वाढ झाली आहे.