Amit Shah On CAA esakal
देश

What is CAA : काय आहे सीएए? लागू झाल्यानंतर देशभरात होतील 'हे' बदल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी CAA लागू करण्याबाबत घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात सीएए लागू करण्याची अधिसूचना जारी करुन हा कायदा लागू करण्यात येईल, असं शाहांनी स्पष्ट केलं.

संतोष कानडे

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी CAA लागू करण्याबाबत घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात सीएए लागू करण्याची अधिसूचना जारी करुन हा कायदा लागू करण्यात येईल, असं शाहांनी स्पष्ट केलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ११ डिसेंबर २०१९ मध्ये राज्यसभेत सीएए विधेयक मंजूर करून घेतले होते. हे विधेयक लोकसभेतही मंजूर झालेले आहे. या कायद्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील अल्पसंख्याकाच्या भारतात पुनर्वसनाचा म्हणजेच त्यांना नागरिकत्व देण्याचा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात येतं.

  • अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांमध्ये अल्पसंख्याक म्हणजे हिंदू आणि शीख नागरिकांवर अत्याचार होतात. त्यामुळे लाखो लोक भारतात दाखल झालेले आहेत. त्या सगळ्यांना नागरिकत्व देण्यासाठीचा हा सीएए कायदा आहे.

  • राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिलेला आहे. परंतु याच समानतेच्या कलम १४ चं उल्लंघन भाजप सरकार करत असल्याचा आरोप यावरुनच होतोय.

हा कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच या कायद्याकडे मुस्लीमविरोधी म्हणून बघितलं गेलं. २०१९-२० मध्ये देशभर आंदोलनं पेटली होती.

  • 'सीएए'विरोधात देशभर आंदोलनं झाली. त्यात विशेष म्हणजे दिल्लीतील शाहिनबाग येथील आंदोलन देशभर गाजलं. त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ देशातील इतर आंदोलनांच्या ठिकाणांना शाहिनबाग संबोधलं गेलं.

  • कोरोनानंतर हे आंदोलन शांत झालं. आता पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी CAA लागू करण्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे चालू महिन्यात किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीलच हा कायदा लागू होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले अमित शाह?

अमित शाह यांनी स्पष्ट केलं की, सीएए लागू केल्याने कोणत्याही व्यक्तीची नागरिकता काढून घेतली जाणार नाही. याचा उद्देश फक्त धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानी, अफगाणिस्तानी आणि बांग्लादेशी अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणे हा आहे.

शेजारच्या देशातील पीडित अल्पसंख्यांक नागरिकांना नागरिकता देण्याचे वचन काँग्रेसने दिले होते. जेव्हा देशाचे विभाजन झाले होते तेव्हा तेथे अल्पसंख्याकांचा छळ केला जात होता. त्यावेळी सर्वांना भारतात पळून यायचे होते, तेव्हा काँग्रेसने तु्म्ही या, तुम्हाला नागरिकता दिली जाईल, असे सांगितले होते. आता आम्ही तो कायदा आमलात आणणार आहोत, असं शेवटी शाहांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT