देश

गृहमंत्री स्वत: काश्मीरमध्ये असताना पाकच्या विजयाचा जल्लोष गंभीर: संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकामध्ये भारताला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. इतिहासात पहिल्यांदाच याप्रकारे पाकिस्तानविरुद्ध भारत पराभूत झाला आहे. त्यामुळे देशभरातील क्रिकेट चाहते सध्या नाराज आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानच्या या विजयाचे वेगवेगळे पडसाद उमटताना दिसून आले आहेत. जम्मू-काश्मीरमधील काही भागात पाकिस्तानच्या विजयाच्या आनंद साजरा केला गेला आहे. फटाक्यांची आतषबाजी करत काही लोकांनी हा आनंद साजरा केला आहे, पोलिसांनी अशा सहा जणांना ताब्यात घेतलं असल्याचं वृत्त आहे. गेले काही दिवस देशाचे गृहमंत्री अमित शहा काश्मीर दौऱ्यावर आहेत. या सगळ्या प्रकारावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय.

संजय राऊत यांनी म्हटलंय की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वत: काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानी टीमच्या टी-20 मधील विजयाचा आणि भारताच्या पराभवाचा या प्रकारे आनंदोत्सव साजरा केला जातो आहे. तसेच भारतविरोधी घोषणा दिल्या जात असतील, तर निश्चितच चिंतेचा विषय आहे. सरकारने याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. पुढे त्यांनी जय हिंद, वंदे मातरम असं देखील म्हटलंय.

तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री राहिलेल्या मेहबुबा मुफ्ती यांनी पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणार्‍यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांनी काश्मीरींविरोधात संताप प्रकट करणाऱ्या लोकांना विराट कोहलीकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे.

मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विट करत म्हटलंय की, “पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या काश्मिरींवर एवढा राग कशासाठी? देश के गद्दार को, गोली मारो… अशा प्रकारच्या घोषणाही काही लोक देत आहेत. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यावर कितीतरी लोकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला होता, हे कोणीही विसरू शकणार नाही. विराट कोहलीप्रमाणे याकडे योग्य भावनेने पाहा. विराट कोहलीने सर्वप्रथम पाकिस्तानी संघाचे अभिनंदन केले आहे,” असे मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. मेहबुबा मुफ्तींनी या ट्विटमध्ये विराट कोहलीचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यात तो पाकिस्तानी फलंदाज रिझवानशी बोलताना दिसत आहे.

दुबईमध्ये गेल्या रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या टी 20 विश्वचषक सामन्यात भारताच्या क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2007 ते 2016 या दरम्यानच्या काळात भारत विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानकडून कधीही हरलेला नाही. मात्र, आता भारत पराभूत झाल्याचं पहायला मिळालंय. भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानात हवेत गोळीबार केल्याच्या बातम्या येत आहेत. कराचीमध्येच एका उपनिरीक्षकासह अनेक ठिकाणी गोळीबारात १२ जणांना गोळ्या लागल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT