Arvind-Kejriwal 
देश

भाजपकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी कोण?

पीटीआय

नवी दिल्ली - भाजपकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी कोण असा सवाल करत, एकही पात्र व्यक्ती नाही, अशी टीका आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. दिल्ली विधानसभेच्या प्रचाराच्या आज शेवटच्या दिवशी केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेसवर टीका केली. आम आदमी पक्षाचे सरकार पुन्हा आल्यास मोफत योजना कायम राहतील, असे आश्‍वासन त्यांनी दिल्लीकरांना दिले.

दिल्लीत ७० जागांसाठी येत्या शनिवारी (ता. ८) मतदान होत असून, ११ फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे. केजरीवाल यांनी मुलाखतीत म्हटले, की मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता दिल्लीकरांना आहे. निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. निकालातून ते ध्रुवीकरण यशस्वी झाले की नाही हे समजेल. ते म्हणाले, ‘आप’च्या मतदारांना चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा, अत्याधुनिक रस्ते, चोवीस तास वीज हवी आहे. विधानसभा निवडणुकीमुळे भाजपने शाहिनबागच्या आंदोलकांना अद्याप हटविले नसल्याचाही आरोप केजरीवाल यांनी केला. गृहमंत्र्यांकडून आंदोलकांना हटवण्याबाबत अडवणूक का केली जात आहे, अमित शहांचे कोणते हित दडले आहे, असा सवाल केजरीवाल यांनी केला. दिल्लीत आंदोलनावरूत ते घाणेरडे राजकारण करत आहेत. भाजपचे नेते दिल्लीतील बेकायदा कॉलनीला संपूर्णपणे विसरून गले आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहेत. आप पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मोफत योजना सुरूच राहतील आणि गरज भासल्यास आणखी योजना आणल्या जातील, असेही केजरीवाल म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT