Himachal Pradesh Esakal
देश

Himachal Pradesh: आता सुरू झाली खरी लढाई, हिमाचलमध्ये मुख्यमंत्रीपदाचे तीन उमेदवार

1985 पासून हिमाचल प्रदेशात दर पाच वर्षांनी सरकार बदलते

सकाळ डिजिटल टीम

1985 पासून हिमाचल प्रदेशात दर पाच वर्षांनी सरकार बदलते. आता हाच कल यंदाही कायम राहतो की भाजप सरकारमध्ये परत येऊन तो मोडतोड करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दोन्ही पक्षांतून मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार कोण? भारतीय जनता पक्षाने पुन्हा सरकार स्थापन केले तर जयराम ठाकूर यांच्याशिवाय मुख्यमंत्रीपदाचा दावा कोण मांडू शकेल? बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेस सत्तेच्या चाव्या कोणाकडे सोपवणार?

भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली आहे. अशा स्थितीत भाजप पुन्हा सत्तेत आल्यास जयराम ठाकूर हे प्रबळ दावेदार असतील. जयराम यांनी सेरज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. हिमाचल प्रदेश विधानसभेत ते पाच वेळा आमदार राहिले आहेत. 1998 पासून सतत जिंकत आहे. भाजपची सत्ता आल्यास जयराम ठाकूर यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हेही दावेदार होऊ शकतात. 2024 च्या लोकसभा निवडणुका पाहता अनुराग ठाकूर यांनाही सत्ता मिळू शकते.

काँग्रेस कडून 1) मुकेश अग्निहोत्री 2)सुखविंदर सिंह सुक्खू 3)प्रतिभा सिंह या नावांची चर्चा सुरू आहे. हिमाचल प्रदेश येथील एकंदरीत परिस्थिति पाहता काँग्रेसची सत्ता येणार हे दिसून येत आहे. परंतु मुख्यमंत्री पदावर कोण बसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

Monsoon : मॉन्सून २६ मे पर्यंत केरळात दाखल होण्याचे संकेत

ITI Admission : ‘आयटीआय’च्या प्रवेशासाठी २१ मे पासून अर्ज प्रक्रिया होणार सुरू; राज्यात दीड लाखांहून अधिक जागा

SCROLL FOR NEXT