Agniveer Bharati google
देश

Agniveer Death: ड्युटीवरच 'अग्निवीर' का संपवताहेत आयुष्य? काय आहे मोबाईल अन् बंदुकीचं कनेक्शन? जाणून घ्या

अग्निवीरांकडून होत असलेल्या आत्महत्यांच्या प्रकरणांवर लष्कराकडून गांभीर्यानं आणि बारकाईनं नजर ठेवली जात आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : सैन्यात भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेबाबत मोठा वाद सध्या संसदेत पहायला मिळतो आहे. हा विषय थोडासा शांत होतो ना होतो तोपर्यंत कोणत्यातरी अग्निवीरानं आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. त्यामुळं हा विषय सध्या ऐरणीवर आला आहे. २०२२ मध्ये अग्निपथ योजना केंद्र सरकारनं सुरु केली होती. या योजनेंतर्गत भरती झालेल्यांना अग्निवीर असं संबोधलं जातं. ही योजना सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत २० अग्निवीरांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये चौकशीत धक्कादायक बाब समोर आली आहे. अमर उजालानं याबाबत वृत्त दिलं आहे.

अग्निविरांच्या आत्महत्यांची प्रकरणं वाढली

गेल्या महिन्यात १७ जुलै रोजी हिमाचल प्रदेशच्या हमीरपूरचा रहिवासी असलेल्या अग्निवीर निखिल डडवाल यानं गोळी मारुन स्वतःचं जीवन संपवलं होतं. तत्पूर्वी २ जुलै रोजी आग्रा एअर फोर्स स्टेशनमध्ये २२ वर्षी अग्निवीर श्रीकांत कुमार चौधरी यानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती.

गर्लफ्रेन्डसोबत वाद प्रमुख कारण?

लष्कराच्या वरिष्ठ सुत्रांच्या माहितीनुसार, अग्निवीरांच्या आत्महत्यांमागे धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये आत्महत्यांपूर्वी त्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींशी फोनवरुन चर्चा केल्याचं आढळून आलं आहे. यांपैकी काही प्रकरणं ही गर्लफ्रेन्डसोबत होत असलेले वाद हे एक प्रमुख कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. गर्लफ्रेन्डसोबत चर्चा सुरु असताना अचानक हे अग्निवीर आक्रमक होऊन आत्मघाती पाऊल उचलण्यास भाग पडत आहेत.

अग्निपथ योजनेची प्रमुख अट आहे की, अग्निवीरांना सेवेदरम्यान लग्न करण्याची परवानगी नाही. त्यामुळं कामावर रुजू होताच त्यांना आपलं घर, मित्र आणि गर्लफ्रेन्डपासून दूर राहावं लागतं. यानंतर त्यांच्यामध्ये ब्रेकअप सारखे इश्यू निर्माण होतात. त्यातूनच ते पुढे आत्महत्यांसारखी पावलं उचलत आहेत.

मोबाईल फोन अन् बंदूकीचा संबंध काय?

अग्निवीरांमध्ये जास्त करुन आत्महत्यांची प्रकरण समोर आली आहेत. दिवसभरात किंवा रात्री जेव्हा ते ड्युटीवर एकटे असतात तेव्हा ते गुपचूप आपला मोबाईल फोन घेऊन जातात. पण ड्युटीवर हा कडक नियम आहे की या काळात ते सोबत मोबाईल फोन ठेवू शकत नाहीत. पण तरीही ही मुलं लपवून फोन घेऊन जातात. रात्री उशीरापर्यंत ते फोनवर बोलतात या वेळी त्यांच्या हातात बंदुका असतात. जर गर्लफ्रेन्डसोबत काही कारणांनी त्यांचा वाद झाला तर ते रागावून हातातील बंदुकीचा वापर करुन जीवन संपवण्याचं पाऊल उचलतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Name Change Demand : आता थेट दिल्लीच्याही नावात बदल होणार? ; मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना 'या' व्यक्तीने पाठवलंय पत्र!

Balapur News : भिंत कोसळून आठ वर्षीय चिमुकला ठार; गावावर शोककळा

Women's World Cup 2025: भारताचा बांगलादेशविरुद्ध सामना पावसामुळे रद्द! साखळी फेरी संपली पाँइट्सटेबलमध्ये कोण कोणत्या स्थानी?

Tejashwi Yadav on Waqf Act : ‘’…तर आम्ही ‘वक्फ कायदा’ कचऱ्याच्या डब्यात टाकू’’ ; तेजस्वी यादव यांचं मोठं विधान!

Mohol Politics : अखेर ठरलं! सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांचा बुधवारी हजारो कार्यकर्त्यासह भाजपात होणार प्रवेश

SCROLL FOR NEXT