Why Is PM Modi Hiding Asks Rahul Gandhi On India-China Violent Face off 
देश

चीनची हिंमत कशी झाली, असे म्हणत मोदी गप्प का? राहुल गांधींचा सवाल 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गलवाण खोऱ्यातील संघर्षावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत प्रश्न उपस्थित करत आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली? असा प्रश्न राहुल गांधी यांनी मोदींकडे उपस्थित केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गलवाण खोऱ्यात झालेल्या संघर्षांत भारताचे १७ जवान जखमी झाले होते. पण रात्रीच्या प्रचंड थंडीत त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला तीन आणि नंतर १७ असे २० जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे ४३ सैनिक या संघर्षांत मरण पावले. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांच्या लष्कारात झालेल्या संघर्षावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत व चीन यांच्या लष्करी चर्चा सुरू असतानाच सोमवारी पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात अचानक संघर्ष झाला. 
-------------
लॉकडाऊनच्या काळात तुम्हीही काढू शकता पैसै; कसे ते घ्या जाणून
--------------
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा दस का दम; दहाव्या दिवशीही वाढले दर
--------------
अभिमानास्पद! 'Black live Matter'आंदोलनाचे नेतृत्व एका भारतीय-अमेरिकन महिलेच्या हाती
---------------
राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले आहेत. पंतप्रधान का शांत आहेत? ते का लपवत आहेत? आता हे पुरे झालं. काय घडलं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली? आपला भूभाग घेण्याची त्यांनी हिंमत कशी केली? असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.

अरुणाचल प्रदेशातील तुलुंग ला येथे १९७५ मध्ये चीनच्या हल्ल्यात चार भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर सुमारे साडेचार दशकांनंतर भारत-चीन सैन्याच्या संघर्षांत ही जीवितहानी झाली आहे. दोन्ही बाजूंकडील सैन्य संघर्षपूर्व स्थितीला नेण्याची प्रक्रियाही सुरू झाली होती. यामुळे तणाव कमी होत असतानाच ही घटना घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

SCROLL FOR NEXT