Corona-Virus 
देश

चीनमधून ६०० भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणणार

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - जीवघेण्या कोरोना विषाणूच्या उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या हुएई प्रांतातील ६०० भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यास आजपासून सुरुवात होऊ शकते. यासाठी दोन विशेष विमाने तयार ठेवण्यात आली असून चीनच्या सरकारकडून औपचारिक होकारानंतर या विद्यार्थ्यांना भारतात आणले जाईल. 

हुवेई प्रांतात सुमारे १२०० भारतीय विद्यार्थी आहेत. कोरोना विषाणूच्या उपद्रवानंतर यातील आतापर्यंत ६०० हून अधिक जणांना चीनमधील भारतीय वकिलातीतर्फे मायदेशी येण्यासाठी संपर्क साधण्यात आला. त्यांच्यासाठी दोन विशेष विमानेही तयार ठेवण्यात आली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी साप्ताहिक वार्तालापादरम्यान सांगितले. 

चीनमधील कोणत्याही भारतीय नागरिकाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याची आतापर्यंतची माहिती आहे. १५ जानेवारीनंतर चीनमधून भारतात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय चाचणी केली जाईल. त्यानंतरच प्रवेश दिला जाईल. अशा प्रवाशांना किमान १४ दिवस एकांतवासात निरीक्षणाखाली ठेवले जाईल. केंद्रीय मंत्रीमंडळ सचिवांनी आज याबाबत घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्यात मोठी घसरण! 21 दिवसांतील नीचांकी दर; उच्चांकापेक्षा तब्बल ₹23,500 कमी; आजचा ताजा भाव पाहा

Sankashti Chaturthi 2026: 3 वर्षांनी जुळून आलाय दुर्मिळ विभुवन योग! बाप्पाच्या कृपेने मेषसह ‘या’ 2 राशींचं नशीब अचानक चमकणार, होणार धनलाभाचा वर्षाव!

Khan Sir Patna Controversy : कोचिंग सेंटर बाहेर गोळीबाराच्या आरोपावरुन खान सरांचा यु-टर्न; नेमकं काय घडलं? सांगितले सत्य

Latest Marathi News Live Update : विधानपरिषद निवडणुकीतून माघारीसाठी रात्री उशिरापर्यंत उदय सामंत यांची खलबते

Dudh Halwa: फक्त मिठाई नाही, तर पिढ्यानपिढ्या जपलेला वारसा! ललितपूरच्या 'दूध हलव्या'ला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सरकारचा मेगा प्लॅन!

SCROLL FOR NEXT