Amit Shah esakal
देश

Video : कोरोना संपताच CAA कायदा लागू करणार; शहांचे मोठं विधान

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी मोठे विधान केले असून, कोरोना संपल्यानंतर नागरिकत्व कायदा लागू करू असे मोठे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. शहा दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आले असून त्यावेळी ते बोलत होते. सुधारित नागरिकत्व कायदा हे वास्तव असून तृणमूल काँग्रेस त्याबाबत काहीही करू शकत नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी ममतांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, दीदींच्या राजवटीत भ्रष्टाचार, सिंडिकेट आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. त्यामुळे ममता दीदींनी असा विचार करू नये की, भाजप पलटवार करणार नाही.

तृणमूल काँग्रेस अफवा पसरवत आहे की, नागरिकत्व कायदा कधीही अस्तित्वात येणार नाही. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, कोविड महामारी संपल्यावर आम्ही CAA लागू करू. ममता दीदींना घुसखोरी हवी आहे, पण CAA हे वास्तव आहे, त्याची अंमलबजावणी केली जाईल असे शहा यांनी यावेळी स्पष्ट केले. देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अभेद्य करणे हे मोदी सरकारचे मूळ लक्ष्य असून, आम्ही आमच्या सैनिकांना सीमेवरील सुरक्षेसाठी जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे काम करत आहोत. आज सतलज, कावेरी आणि नर्मदा फ्लोटिंग बीओपी राष्ट्राला समर्पित असल्याचेही यावेळी शहा यांनी सांगितले.

सैनिकांच्या कुटुंबासाठी कोणतीही कसर सोडणार नाही

पुढे बोलताना शहा म्हणाले की, सीमाभागात तैनात असलेल्या देशाच्या सैनिकांना कमीत कमी त्रास सहन करावा लागेल, यासाठी काय करता येईल यावर काम करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. तसेच सैनिकांच्या कुटुंबीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी भाजप कोणतीही कसर सोडणार नसल्याचेही यावेळी शहा यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

China: तिबेटप्रमाणे भूतानची जमीन हडपण्याची चीनची तयारी; आता 'या' नव्या जागेवरही दावा

Pune News : पुण्यातील खड्ड्यांची समस्या कायम, 'पीएमसी रोड मित्र' ॲपवर १२७४ तक्रारी

IND vs UAE: कुलदीप यादवच्या फिरकीला शिवम दुबेची साथ अन् युएई संघ ६० धावांच्या आत ऑलआऊट

SCROLL FOR NEXT