देश

Loksabha Result : पराभवाचा दणका; राहुल गांधी राजीनामा देणार?  

वृत्तसंस्था

लोकसभा निकाल 2019 :
नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा मोदींची सत्ता आल्यावर राहुल गांधी यांनी मोदींचे अभिनंदन केले आहे तर, राहूल यांच्याकडून अमेठीतील आणि देशातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. काँग्रेस कार्यकारीणीत लवकरच ही यावर चर्चा होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

राहुल गांधी यांनी दीड वर्षापूर्वी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांत त्यांनी मोठा विजय मिळावल्यानंतर उत्साहाचे पक्षात त्यांच्याविषयी उत्साहाचे वातावरण तयार झाले होते, परंतु आजचा पराभव त्यांच्याही चांगलाच जिव्हारी लागला असल्याचे दिसत असून त्यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिला आहे.

दरम्यान, या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. उत्तर प्रदेशमध्ये मायावती-अखिलेश यादव यांनी परस्पर आघाडी करत कॉंग्रेसला धक्का दिला. त्यानंतर इतर राज्यांमध्येही कॉंग्रेसला आघाडीच्या पातळीवर फारसे यश मिळाले नाही. उमेदवार निवडतानाही कॉंग्रेसने अनेक ठिकाणी चालढकल केली. त्याचाही मोठा फटका पक्षाला बसल्याचे निकालामध्ये दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamuna Expressway Accident: मध्यरात्री धुक्यात अचानक आगीचा भडका… क्षणात पेटल्या ८ बस-कार; प्रवासी जीवंत जळाले... रात्रीचा थरारक क्षण

Solapur Crime:'विद्यार्थिनींवर अत्याचार करणारा शिक्षक बडतर्फ'; वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा, जन्मठेपेची शिक्षा अन्..

राज्य सरकारचा माेठा निर्णय! 'गुन्हा लपविल्यास मुख्याध्यापकासह व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा'; जबाबदारी केली निश्‍चित..

मोठी बातमी! कमी पटाच्या झेडपी शाळांवर कंत्राटी शिक्षक; ७० वर्षांपर्यंतच्या सेवानिवृत्त शिक्षकांची २० हजार रुपयांच्या मानधनावर होईल नेमणूक

Pune News : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून पुण्याला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याचा उपक्रम; शहराच्या सर्वांगीण विकासावर फडणवीसांचा जोर!

SCROLL FOR NEXT