अभियांत्रिकी  sakal News
एज्युकेशन जॉब्स

अभियांत्रिकी प्रवेशानंतर पदवीच्या जागा राहणार रिक्त

अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया लांबल्याने बहुतांश विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमात तात्पुरता प्रवेश घेतात

मंगेश गोमासे - सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सीईटी सेलद्वारे घेण्यात येणारी ‘एमएचसीईटी’ संपलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या निकालानंतर अभियांत्रिकी प्रवेशास सुरवात करण्यात येईल. अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया लांबल्याने बहुतांश विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमात तात्पुरता प्रवेश घेतात. मात्र, आता प्रवेश सुरू होताच विद्यार्थी पदवी अभ्यासक्रम सोडून जात असल्याने यंदाही पारंपरिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहणार असल्याने महाविद्यालयांची धाकधूक वाढली आहे.

अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी राज्याच्या सीईटी सेलमार्फत एमएचसीईटी घेण्यात येते. मात्र, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून परीक्षा लांबल्याने प्रवेशाची प्रक्रियाही लांबली आहे. चार दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांनी एमएचसीईटी परीक्षा दिली. आता काही दिवसात त्याचा निकालाची घोषणा झाल्यावर प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आपल्या सुविधांसाठी अगोदरच एखाद्या नामवंत महाविद्यालयात विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतात. त्यामुळे बहुतांश महाविद्यालयांचे प्रवेश अल्पावधीत फुल्ल होतात.

विशेष म्हणजे, त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी भटकावे लागते. त्यासाठी विद्यार्थी संघटना निवेदन सादर करीत, २० टक्के जागा वाढही मागताना दिसून येतात. याचा फायदा घेत, महाविद्यालये जागा भरून घेतात. मात्र, अभियांत्रिकीसह इतर विषयांची प्रवेश परीक्षा सुरू होताच, विज्ञान आणि वाणिज्य या पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थी त्याकडे वळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांद्वारे प्रवेश रद्द करण्यात येतो. त्यामुळे नामवंत महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असल्याचे चित्र निर्माण होते.

गेल्यावर्षी शहरातील जवळपास सर्वच महाविद्यालयात हे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या प्रवेशाची अंतिम तारीख निघून गेल्याने या जागा महाविद्यालयांना भरता येणे अशक्य होते. त्यामुळे महाविद्यालयांना मोठा फटका बसत असल्याचे दिसून आले. हीच परिस्थिती यावर्षीही येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरवर्षी अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया लांबते. मात्र, प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत विद्यापीठाच्या प्रवेशाची अंतिम तारीख निघून जाते. एकदा तारीख निघाल्यावर प्रवेश करता येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याचे चित्र गेल्यावर्षी दिसून आले.

- डॉ. महेंद्र ढोरे, प्राचार्य, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Train Food : ‘वंदे भारत रेल्वे’त प्रवाशांना आता स्थानिक पदार्थ दिले जाणार ; रेल्वेमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!

PMC Retired Employees : निवृत्तीनंतर दिलासा; २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार!

Pune Health : कर्करोग निदानासाठी पुणेकरांना मोठा दिलासा; महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर सुरू; खासगी रुग्णालयांपेक्षा निम्म्या खर्चात!

Soybean MSP : आधारभूत किमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको; आमदार डॉ. संजय कुटे यांनी अधिवेशनात मांडली ठाम भूमिका!

SCROLL FOR NEXT