एज्युकेशन जॉब्स

‘अ’ ऑनलाइनचा : कार्यकारण भाव लक्षात ठेवा...

प्रत्येक विषयात संकल्पना समजून घेण्यासाठी फार काही वेगळे करावे लागत नाही. प्रत्येक विषयातून विविध संकल्पना, घटना, प्रक्रिया या सर्व कार्यकारण भावावरच अवलंबून असतात.

डॉ. उमेश देवदत्त प्रधान

प्रत्येक विषयात संकल्पना समजून घेण्यासाठी फार काही वेगळे करावे लागत नाही. प्रत्येक विषयातून विविध संकल्पना, घटना, प्रक्रिया या सर्व कार्यकारण भावावरच अवलंबून असतात. काय झाले की काय घडते हे लक्षात ठेवले, त्यातील तार्किकता (logic) समजून घेतली की झाले. यालाच इंग्लिशमध्ये ‘cause and effect relation’ असे म्हणतात. कोणत्याही विषयातील उत्तरांचा नीट अभ्यास केला, तर असे लक्षात येईल की प्रत्येक घटनेमागे काही कारणे असतात आणि प्रत्येक घटनाही पुढील काही घटनांचे कारण असते. एखादी घटना का घडली? त्यामागचे कारण काय होते? का? हे लक्षात घेतले तर आपोआप तुम्हाला परिणाम काय ते जाणवायला लागते. याच्या आधारे

तार्किकता महत्त्वाची

तुम्हाला दोन घटनांमधील सहसंदर्भ लक्षात ठेवायला नक्की मदत होईल. कारण एखादी घटना घडायला, समस्या निर्माण व्हायला कारणीभूत ठरलेली गोष्ट, परिणाम याचा अर्थ बदल किंवा निष्कर्ष. यात प्रथम काय घडले आणि त्याचा परिणाम म्हणून काय झाले हा संबंध लक्षात घेणे जरुरीचे आहे. प्रत्येक विषय अभ्यासताना जर ही तार्किकता लक्षात घेतली तर पाठांतर करण्याची अजिबात आवश्यकता नाही.

कार्यकारण संबंध

इतिहासातील घटनांचा अभ्यास तर पूर्णपणे कार्यकारण संबंधांवरच अवलंबून आहे. कोणत्याही घटनेमागची कारणे आणि एका घटनेतून निर्माण झालेली दुसरी घटना असा घटनांची साखळी लक्षात ठेवणे सहज शक्य आहे. हा घटना आणि कारणे यांचा क्रम लक्षात घेणे म्हणजेच इतिहासाचा अभ्यास होय. भूगोलाचा अभ्यास करताना एकदा का एखाद्या स्थानाचे अक्षांश रेखांश समजले, की मग तिथले हवामान, पर्जन्यमान, वनस्पती जीवन, प्राणी जीवन, मनुष्यांचे व्यवसाय ही साखळी लगेच लक्षात येईल. ही भूगोलातील तार्किकता एकदा लक्षात आली की मग संपूर्ण विषय अभ्यासणे सोपे होऊन जाते.

कारणे आणि परिणाम

विज्ञान आणि गणित हे विषय तर या कारणे आणि परिणाम यांच्या अभ्यासावरच अवलंबून आहेत. कोणताही प्रयोग हा त्यातील घटना, कारणे आणि परिणाम या त्रयीवरच अभ्यासता येतो. एखादी निसर्गातील घटना समजून घेणे म्हणजेच काय तर त्यातील कार्यकारण संबंध लक्षात घेणे. सर्व अभ्यासाचा हा पायाच आहे. शास्त्रज्ञांनी काय केले, तर प्रत्येक समस्येमागील हा कार्यकारण भाव शोधण्याचा प्रयत्न केला. गणितात आकडेवारी बदलली, चिन्ह बदलले की त्याचे निष्कर्षपण बदलणार हे नक्की. म्हणजे लक्षात काय घ्यायचेय, तर हा कार्यकारण भाव. काय केले म्हणजे काय होते, एकदा ते लक्षात आले की अभ्यास झालाच म्हणून समजायचे. गणितातील सूत्र म्हणजे तरी काय कारण आणि परिणाम यांची केलेली क्रमबद्ध अशी मांडणीच असते. अर्थशास्त्राचा अभ्यासही कारण आणि त्याचे होणारे परिणाम यांचाच अभ्यास आहे. एकदा का हा भाव, संबंध लक्षात आला की मग बाकी दुसरा कसलाच अभ्यास करायला नको. तुमचा अभ्यास झालाच म्हणून समजा. प्रत्येक विषय असा या तत्त्वावरच अवलंबून असतो. एकदा का हे तत्त्व आत्मसात केलेत की मग अभ्यासाची भीती राहणारच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT