know how and when to resign your job Marathi article 
एज्युकेशन जॉब्स

तुमची नोकरी सोडण्याचा योग्य मार्ग कोणता? जाणून घ्या सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : बऱ्याचदा नोकरी करत असताना काही वेळ गेल्यानंतर कामाच्या ठिकाणी गोष्टी बदलल्या सारख्या वाटायला लागतात. नवलाई निघून गेल्यावर एकाच ठिकाणी काम करणे कंटाळवाणे वाटू  शकते. सोबतच तुमच्या करियरची वाढ देखील एकाच ठिकाणी काम करत राहिल्यामुळे पुरेशी होत नाहीये असे वाटायला लागते. आपण यापेक्षा चांगले कहीतरी करु शकतो असे वाटायला लागले की नोकरी सोडण्याचे विचार मनात यायला लागतात. नोकरी सोडताना काही गोष्टी काळजीपुर्वक करण्याची गरज असते , आज आपण अशाच गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. 

थेट रिजाईन करु की बॉसशी बोलू?

बऱ्याचदा नोकरी सोडली तर दुसरी नोकरी कधी मिळेल याविषयी खात्री नसते. जर लगेच नोकरी मिळाली तर पगार किती असेल, वेळ काय असेल असे  प्रश्न सतावत राहातात.  नोकरी सोडताना काही दिवस आधी तसे लेखी पत्र द्यावे लागते,  परंतु परिस्थिती प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी असू शकते आणि हा निर्णय बऱ्याचदा वैयक्तिक गरजा पाहून तसेच कामचे क्षेत्र कोणते आहे अशा इतर अनेक घटकांवरही अवलंबून आहे.  नोकरी सोडण्याआधी तुमच्या बॉसशी देखील याविषयी बोलू शकता. सध्याच्या नोकरीत तुमचे पद किंवा पगार वाढू शकतो का हे बॉसला विचारुन घ्या. तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी मिळणारे पद आणि पगार जर याच ठिकाणी मिळत असेल तर नोकरी सोडण्याची गरज उरत नाही. 

राजीनामा पत्रात काय लिहायचे?

राजीनामा लिहीत असतान त्यामघ्ये बऱ्याच जणांची इच्छा असते की त्यांच्या मनातील नाराजी व्यक्त करावी. पण तसे करणे योग्य राहाणार नाही तुम्ही कितीही भावणिक असाल तरी राजीनामा हा व्यवस्थित लिहीणे अपेक्षित आहे. त्यामध्ये व्यक्तिगत आरोप करणे टाळा. नोकरी सोडताना सर्व सहकाऱ्यांशी कृतज्ञतापूर्वक निरोप घ्या, कारण तुम्हाला पुढच्या वाटचालीत कदाचीत यांच्यासोबत  काम करण्याची वेळ येऊ शकते. 

तुमचा पगार वाढवण्यात आला तर?

जर तुम्ही फक्त कमी पगार मिळतो म्हणून नोकरी  सोडणार असाल आणि जर कंपनीने तुमचा पगार वाढवला तर तुम्ही त्या ठिकाणीच नोकरी करु शकता. मात्र जर नोकरी सोडण्यामागे इतर कारणे देखील असतील तर मात्र तुम्ही आवश्य नोकरी सोडा. जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर तुम्ही नोकरी सोडण्याची धमकी दिली तरी तुमचा पगार वाढण्याची शक्यता असते असा अनुभव बरेच जण सांगतात.

ते तुम्हाला सोडायत नसतील तर?

जर तुम्ही आपले काम योग्यरित्या केले असेल आणि कंपनीच्या नियमांचे पालन केले असेल तर कोणतीही कंपनी आपल्याला थांबवू शकत नाही, जर आपण करारामध्ये लिहिलेली नोटीस कालावधीपर्यंत काम केले असेल आणि तरीही ते आपल्याला सोडत नसतील, तर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT