mathematics and science sakal
एज्युकेशन जॉब्स

शालेय विद्यार्थ्यांचा गणित आणि विज्ञानाचा पाया कच्चा

राज्यातील इयत्ता पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे गणित आणि विज्ञानाचा पाया कच्चा असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षणातून(नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे- एनएएस) समोर आली आहे.

मीनाक्षी गुरव

राज्यातील इयत्ता पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे गणित आणि विज्ञानाचा पाया कच्चा असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षणातून(नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे- एनएएस) समोर आली आहे.

पुणे - राज्यातील इयत्ता पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे गणित आणि विज्ञानाचा पाया कच्चा असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षणातून(नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे- एनएएस) समोर आली आहे. या सर्वेक्षणात त्या-त्या इयत्तानिहाय अभ्यासक्रमाशी निगडित प्रश्न विचारले असता विद्यार्थ्यांना दिलेल्या गणित, विज्ञान विषयातील कामगिरी ही ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षण (एनएएस) हे राष्ट्रीय पातळीवर इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणातून काय साध्य केले, हे पाहण्यासाठी करण्यात येते. यामध्ये राज्यातील सरकारी, अनुदानित, खासगी विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार राज्यातील साक्षरता दर हा ८२.३ टक्के इतका असल्याचे आढळून आले आहे.

भाषा कौशल्य, गणित, पर्यावरण, विज्ञान आणि सामाजिकशास्त्र, इंग्रजी यातील मूल्यांकन करण्यात आले आहे. यामध्ये तिसरीसह पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे भाषा विषयातील कामगिरी मात्र ६० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.

विद्यार्थ्यांचे म्हणणे टक्केवारीत :

प्रश्न : तिसरी : पाचवी : आठवी : दहावी

- शाळेत जायला आवडते का : ९९ टक्के : ९८ टक्के : ९८ टक्के : ९८ टक्के

- शिक्षकांनी शिकविलेले विद्यार्थ्यांना कळते का : ९८ टक्के : ९८ टक्के : ९८ टक्के : ९८ टक्के

- शैक्षणिक कामगिरीत पालकांचा पाठिंबा मिळतो का : ८६ टक्के : ८५ टक्के : ८३ टक्के : ८४ टक्के

शिक्षकांचे वाढतयं ‘टेन्शन’

शिक्षक म्हणतात,

प्रश्न : तिसरी : पाचवी : आठवी : दहावी

कामाचा अतिताण पडतो : ३३ टक्के : २८ टक्के : २६ टक्के : २७ टक्के

असा झाले सर्वेक्षण :

तपशील : देश : महाराष्ट्र

- शाळांची संख्या : १,१८,२७४ : ७,२२६

- शिक्षकांची संख्या : ५,२६,८२४ : ३०,५६६

- विद्यार्थ्यांची संख्या : ३४,०१,१५८ : २,१६,११७

- साक्षरता दर : ७३ टक्के : ८२.३ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT