एज्युकेशन जॉब्स

संधी करिअरच्या : दहावीनंतर शाखा निवडताना

विवेक वेलणकर

दहावीचं निम्मं वर्ष सरल्यावर पालक आणि विद्यार्थ्यांना वेध लागतात दहावीनंतर पुढे काय करायचे याचे. अजूनही अनेक पालक, विद्यार्थी हा निर्णय दहावीला किती गुण मिळाले यावर घेतात. मग ७५-८० टक्के गुण मिळाल्यास विज्ञान शाखा, ७०-८० टक्के मिळाल्यास वाणिज्य आणि त्याहून कमी मिळाल्यास कला, होम सायन्स, आयटीआयची निवड केली जाते. दहावीला घोकंपट्टी, प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव यांमुळेही चांगले गुण मिळू शकतात आणि शाखानिवड चुकते. केवळ ऐंशी टक्के मार्क मिळाले म्हणून शास्त्र शाखेत प्रवेश घेणे योग्य नाही, पण अनेकदा इतके चांगले मार्क मिळालेत तेथेच प्रवेश घेण्याचे दडपण पालक, शिक्षक, नातेवाईक, शेजारी, मित्रमैत्रिणी यांच्याकडून आणले जाते. मात्र, पाय पक्का नसल्याने अकरावी, बारावी जड जाऊ शकते. मिळालेले मार्क, विषयांचे परिपूर्ण आकलन व आवड यांचा थेट संबंध असतोच असे नाही. 

या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की विद्यार्थ्यांना स्वतःला मनातून नक्की माहिती असते दहावीपर्यंत आपल्याला कुठले विषय आवडले, समजले, झेपले आणि कुठले विषय आवडले नाहीत, समजले नाहीत, झेपले नाहीत. आपण कोणत्या विषयात न समजता रेटून पाठांतराच्या जोरावर मार्क मिळवले आहेत. फक्त ही गोष्ट उघड बोलून दाखवण्याचे धाडस ते करू शकत नाहीत आणि त्या विषयात उत्तम मार्क मिळाल्यावर तर नाहीच नाही! आणि मग मार्कांच्या आधारे निर्णय घेतला जातो. अजून एका प्रकारे विद्यार्थी दहावीनंतर शाखा निवडीचा निर्णय करतात, तो म्हणजे आपले जवळचे मित्र-मैत्रिणी जी शाखा निवडतात, तीच शाखा आपण निवडायची. ही अत्यंत अशास्त्रीय पद्धत आहे आणि यापद्धतीने घेतलेला निर्णय अनेकदा चुकतोच. दर वर्षी अशा शेकडो केसेस अकरावी, बारावीनंतर माझ्याकडे येतात, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि आयुष्यातील मोलाचा वेळ वाया जातो. या सगळ्याचा अर्थ स्पष्ट आहे, की मार्क किती मिळाले याआधारे किंवा मित्र-मैत्रिणी काय निवड करतात या आधारे दहावीनंतर शाखा निवड करणे अशास्त्रीय व धोक्याचे आहे. 

दहावीनंतर शाखानिवड करावी तरी कशी याचे उत्तर आपण पुढील भागात घेणार आहोत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: राहुल नार्वेकरांचा निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव? आठ उमेदवारांची न्यायालयात धाव; तातडीच्या सुनावणीस नकार

Siddheshwar Yatra 2026: यंदा सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा 13 की 14 जानेवारी? जाणून घ्या मुख्य पूजा विधी

Latest Marathi News Live Update : हर्षवर्धन सपकाळ हे सपकाळ नसून महाराष्ट्रासाठी साप आहेत - विजय चौधरी

सोज्वळ ताई म्हणून नाव असलेली एक मराठी अभिनेत्री आहे तिने... सायलीच्या ऑनस्क्रीन सासूबाईंची मोठी फसवणूक

बायकोसोबत घटस्फोट घेतला आणि पुन्हा तिच्याच प्रेमात पडला, आता तिलाच डेट करतोय 'हा' प्रसिद्ध अभिनेता

SCROLL FOR NEXT