Narali Purnima 2022 sakal
फूड

Narali Purnima 2022: आज बनवा टेस्टी नारळी भाताची रेसिपी

आज नारळी पौर्णिमेनिमित्त आपण नारळी भात कसा बनवायचा, हे जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

आज नारळी पौर्णिमा आहे. नारळी पौर्णिमाच आपण रक्षाबंधन म्हणून साजरी करतो. शिवाय नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून मासेमारीला परत सुरूवात केली जाते. पौर्णिमेला नारळी भात करण्याची प्रथा आहे. समुद्र किनारपट्टीवर नारळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. त्यामुळे तिथे नारळाला विशेष महत्त्व आहे.

आज नारळी पौर्णिमेनिमित्त आपण नारळी भात कसा बनवायचा, हे जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया नारळी भाताची रेसिपी.

साहित्य:

  • 1 वाटी बासमती तांदूळ

  • पाऊण वाटी खोवलेला नारळ

  • आवडीनुसार अर्धा ते पाऊण वाटी किसलेला गूळ

  • 1 टेबलस्पून साजुक तूप

  • 4 लवंगा

  • 4 वेलच्या

  • 1 दालचिनीचा छोटा तुकडा

  • पाव टीस्पून जायफळाची पूड

  • पाव टीस्पून मीठ

  • केशराच्या 7-8 काड्या

  • अर्धी वाटी काजू तुकडा

कृती

  • सुरवातीला तांदूळ स्वच्छ धुवून निथळत ठेवा.

  • त्यानंतर लहान कुकरमध्ये तूप गरम करा. तूप चांगलं गरम झालं की त्यात लवंगा, वेलच्या आणि दालचिनी घाला.

  • आता त्यात निथळलेले तांदूळ घालून चांगलं परता.

  • त्यात किसलेला गूळ, खोवलेलं खोबरं, मीठ, जायफळ पूड, काजू तुकडा, केशराच्या काड्या घाला. सगळं नीट मिसळून घ्या. गुळाऐवजी साखरही वापरता येईल.

  • गुळ विरघळला की त्यात दीड वाटी पाणी घाला आणि कुकरचं झाकण शिटीसकट लावा. दोन शिट्यांमधे किंवा मंद गॅसवर दहा मिनिटांत भात शिजतो.

  • या भातामध्ये आवडीनुसार पिवळा रंग घालू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT