mango coconut barfi
mango coconut barfi sakal
फूड

फ्युजन किचन : आंबा, नारळ बर्फी

सकाळ वृत्तसेवा

- नीलिमा नितीन, फूड ब्लॉगर

यश चोप्रांच्या फिल्म्सनी उत्तर भारतीय लोकांच्या करवा चौथला काय ग्लॅमर दिलं बघा! काय तो शृंगार, मेहंदी, गाणं आणि ते चाळणीतून चंद्र बघणं आणि त्यानंतर त्या बाईला मिळणारी खूप सारी गिफ्ट्स. काय तो उपवासाचा थाटमाट! वाह!

असो, हे उपवासाचं प्रकरण काही मला फारसं जमत नाही. त्यातही माझं क्षेत्र असं, की मोबाईल हातात घेतला रे घेतला, की एकापेक्षा एक पदार्थांची रेलचेल असते. म्हणजे अगदी जेवण झाल्यावरही भूक चाळवली जाईल, असे एकापेक्षा एक पदार्थ दिसत असतात.

मग उपवासाच्या दिवशी तर कहरच. पाणीपुरी काय, गुजराती, राजस्थानी, साउथ इंडियन वगैरे वगैरे भारतीयच नव्हे, तर परदेशी पदार्थांचाही मार असतो. केक, चॉकलेट, पिझ्झा आणि बरंच काही म्हणजे नुसता मानसिक छळ असतो हो.

बरं, ज्याच्यासाठी आपण उपवास करायचा त्याचं मात्र मस्त ताव मारणं चालू असतं आपल्या डोळ्यांदेखत. त्या नवरोबाला आपण त्याच्यासाठी उपाशी बसलो आहोत हे लक्षातही नसतं. मग मात्र माझ्या रागाचा पारा हा सध्याच्या गर्मीच्या पाऱ्याशी स्पर्धा करतो आणि दरवर्षी वटपौर्णिमेअखेरीस मी अगदी निक्षून सांगते, ‘‘या वर्षी केला हा उपवास, पुढच्या वर्षीपासून नाही करणार. म्हणजे ज्या ज्या राज्यांत हा उपवास नसतो तिथं कुठं काय बिघडतं? शिवाय माझ्या वडिलांनी लहानपणापासून सांगितलं आहे की प्रत्येक सणाचा अर्थ समजून घे. उगाच सगळे करत आहेत म्हणून करू नको.’’

जसजशी वटपोर्णिमा जवळ येऊ लागते, तसतसं माझं वैचारिक द्वंद्व सुरू होतं. म्हणजे उपवास करू? का नको? मग ज्या नवरोबासाठी हा उपवास करायचा, त्याच्या वर्षभराच्या वागणुकीचं अवलोकन सुरू होतं. (मज्जा आहे की नाही सगळी?) मग झालेली भांडणं, त्यानं काढलेली समजूत, कसा तो माझ्या छोट्या छोट्या सवयींची दखल घेतो. सकाळची अतिप्रिय असलेली झोप मला शनिवारी, रविवारी तरी मिळावी यासाठी आवाज न होण्याची खबरदारी घेतो आणि शनिवार, रविवारचा तो आयता मिळणारा चहा. वाह! हळूहळू निर्णय निश्चित होतो आणि दर वर्षीं मी उपवास करते.

माझ्या मते, तुम्ही उपवास करा किंवा करू नका; पण प्रेम नक्की व्यक्त करा. आणि हे व्यक्त करताना काहीतरी गोड हवंच नाही का? आजची रेसिपी ही खास त्यासाठीच. उपवासाला चालणारी व इतर महिलांना द्यायला सोपी जाणारी व घरच्यांनाही आवडेल अशी पारंपरिक ‘आंबा नारळ बर्फी.’

साहित्य -

एक वाटी खोवलेला नारळ, पाव वाटी ते अर्धा वाटी साखर तुम्हाला गोड आवडेल त्याप्रमाणे, पाव वाटी क्रीम किंवा साय, पाव वाटीपेक्षा थोडासा जास्त आंब्याचा घट्ट रस, एक छोटा चमचा वेलची पूड, बेदाणे, पिस्ते सजावटीसाठी.

कृती -

  • खोवलेला नारळ, साखर, आंब्याचा रस व (क्रीम) साय एकत्र करून त्याचा गोळा होईपर्यंत जाड बुडाच्या कढईमध्ये परतून घ्या.

  • यात आता वेलची पूड घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.

  • हा गोळा तूप लावलेल्या थाळीत काढून वाटीने थापून घ्या. त्यावर पिस्ते व बेदाणे लावून सजवा व आवडतील त्या आकारात त्याच्या वड्या पाडून घ्या. तुम्ही याचे लाडू पण बनवू शकता. नक्की करून बघा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT