ganesh visarjan Sakal
ganesh article

दर वर्षी गणेशस्थापना अन् विसर्जन का?

पं.नरेंद्र धारणे (धर्म अभ्यासक)

श्रीगणेश पुराण धर्मग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषींनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्रीगणेशाची आराधना केली आणि गणपतींना महाभारत लिहिण्याची विनंती केली. त्या वेळी गणपतींनी होकार दिला. हे लिखाण दिवस-रात्र चालले आणि त्यामुळे गणपतींना थकवा आला आणि शरीरातील पाणीही वर्ज्य झाले. अशा वेळी गणपतींच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यासांनी श्री गणपतींना मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतींची यथासांग पूजा केली.

मातीचे लेपन केल्याने गणपती आखडून गेले म्हणून त्यांना पार्थिव मृण्मय गणेश असे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यासांनी गणपतीकडे पाहिले असता त्यांच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपतीच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपतींना पाण्यात विसर्जित केले. या दहा दिवसांत व्यासांनी गणपतींना खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हापासून गणपती बसविण्याची प्रथा पडली. लोकमान्य टिळकांनी समाजजागृती आणि प्रबोधन यासाठी गणेशोत्सवास सार्वजनिक स्वरूप दिले.

ती प्रथा आजही अव्याहत आणि अखंडितपणे सुरू आहे.

मंगलमूर्ती मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!

(लेखक ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला, शाहिद आफ्रिदीचा सूर बदलला; आता म्हणतो, भारतच दावेदार होता, संजू सॅमसन....

Latest Marathi News Live Update : सोलापुरात घरगुती गॅस ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करताना तांत्रिक अडचणी

Sambhajinagar Panchayat Samiti : छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती सभापती निवडणुकीपूर्वी गोंधळ; ठाकरेंच्या गटाचे तीन सदस्य गायब

Woman Success Story: राेपवाटिकेच्‍या पश्चिम महाराष्ट्रात १३ शाखांद्वारे राेजगार; शारदा भाेसलेंची नावीन्यपूर्ण यशस्‍वी भरारी, राज्यभर बाेलबाला!

"आमच्यात फक्त मैत्री.." विशालसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर रुचिताचा खुलासा ! म्हणाली..

SCROLL FOR NEXT