Dog 
ग्लोबल

माणुसकी जिवंत आहे का? कत्तलखान्यात पाठवण्यासाठी ५० कुत्र्यांना केलं पिंजऱ्यात बंद

अनेक दिवस या मुक्या प्राण्यांना उपाशी ठेवण्यात आलं होतं

शर्वरी जोशी

गेल्या काही काळापासून मुक्या प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. दररोज आपल्या कानावर मुक्या प्राण्यांवर करण्यात आलेल्या अमानुष अत्याचाराच्या घटना पडत आहेत. त्यातच नुकताच एक धक्कादायक प्रकार दक्षिण कोरियामध्ये घडला आहे. एका व्यक्तीने त्याच्या शेतात तब्बल ५० कुत्र्यांना कैद केलं होतं. या घटनेची सोशल मीडियावर चर्चा रंगली असून संबंधित व्यक्तीला फरार झाला आहे.

द. कोरियातील एका व्यक्तीने त्याच्या शेतावरील घरात तब्बल ५० कुत्र्यांना कैद केलं होतं. या कुत्र्यांना कत्तलखान्यात पाठवण्याच्या उद्देशाने कैद करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने केवळ त्यांना कैदच केलं नाही. तर या मुक्या जनावरांचे अतोनात हाल केलं. अनेक दिवस या मुक्या प्राण्यांना उपाशी ठेवण्यात आलं तर त्यांना मारहाणदेखील करण्यात आली.

Yongin शहरातील एका व्यक्तीने ५० कुत्र्यांना कैद केल्याची माहिती पोलिस व प्राणी संघटनेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस व प्राणी संघटनेने घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत कुत्र्यांना कैद करणारी व्यक्ती फरार झाली होती. अॅनिमल प्रोटेक्शन वर्कसने या ५० कुत्र्यांचे प्राण वाचवले असून सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्याक येत आहेत.

दरम्यान, सुटका करण्यात आलेले श्वान प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होते. इतकंच नाही तर अन्न न मिळाल्यामुळे ते अशक्त झाले असून त्यांना पिंजऱ्यात उभंदेखील राहता येत नव्हतं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

Uddhav Thackeray: ५ ऑक्टोबरचा पंचनाम्यांचा मुहूर्त कशासाठी? दुष्काळावरून उद्धव ठाकरे आक्रमक; महाराष्ट्र पिंजून काढण्याची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांचे हाल होणार! ब्लॉकमुळे ४ लोकल रद्द, दोन दिवस कल्याण-कसारा सेवा बंद; रेल्वे वेळापत्रकात मोठे बदल

Marathi News Live Updates : राज्यात 20 ते 25 सप्टेंबरदरम्यान पुन्हा पावसाची शक्यता; हवामान विभागाने वर्तविला अंदाज

तिरडीवरचा अबीर गुलाल पाहून मी... अलका कुबल यांनी सांगितली 'माहेरची साडी'बद्दलची आठवण, म्हणाल्या- स्वतःचं मरण

SCROLL FOR NEXT