58 People Died Due To Heavy Rains In Pakistan 
ग्लोबल

पाकिस्तानमध्ये पावसाचा कहर; ५८ जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पावसाने कहर केला असून वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने ५८ जणांचा बळी घेतला आहे. मागील तीन दिवसांपासून पाकिस्तानामध्ये जोरदार पाऊस चालू आहे. पाकिस्तानमधील प्रशासकिय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांत पावसामुळे झालेल्या मृत्यूंचा पाकिस्तानमधील आकडा हा ५८ आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणने सांगितले आहे की, खैबर पख्तूनख्वा या प्रांतात पावसाचा सर्वाधिक प्रभाव आहे. या भागात एकूण १९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सिंध प्रांतात एकूण १२ लोकांचा पावसामुळे मृत्यू झाला आहे. गिलगिट मध्ये दहा, पंजाब आणि बलूचिस्तान प्रांतात आठ आणि पाकव्याप्त काश्मीर भागात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, पूरामुळे १५८ घरांचा विध्वंस झाला असून १२८ घरांची काही प्रमाणात पडझड झाली आहे. सिंध प्रांतात मदतकार्य चालू असून दादू जिल्ह्यात बचावकार्य करण्यात आले तिथे एकूण २० गावे पाण्याखाली गेली आहेत. त्याचबरोबर बलूचिस्तानच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणांकडून बचावकार्य करण्यात आले आहे. दरम्यान पाकिस्तानच्या हवामान खात्याकडून पुढील आठवड्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune District News: वसतिगृहातून तीन अल्पवयीन विद्यार्थी गायब; १८ दिवस उलटूनही ठावठिकाणा नाही, जुन्नर पोलिसांकडून शोध सुरू

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

रविवारी गुरुचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेश; 'या' ७ राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी

Nilanga Drought: निसर्गाची अवकृपा अन् कृषी विभागाची आकडेवारी; निलंग्यात खरीप पिकांचे १०० टक्के नुकसान, अहवालात ७० टक्केच नोंद

Latest Marathi News Update : शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला

SCROLL FOR NEXT