Papua New Guinea Landslide Esakal
ग्लोबल

Papua New Guinea Landslide: निसर्गाचा कोप! भीषण दुर्घटनेत दोन हजार लोक जिवंत गाडले गेले; नेमकं काय घडलं?

Papua New Guinea Landslide: पापुआ न्यू गिनीमधील एका दुर्गम गावात भूस्खलनामुळे २ हजारांहून अधिक लोक जिवंत गाडले गेल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. या भूस्खलनाचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पापुआ न्यू गिनीमध्ये शुक्रवारी झालेल्या मोठ्या भूस्खलनाच्या दुर्घटनेत 2000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सीएनएनने देशाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या हवाल्याने या बातमीला दुजोरा दिला आहे. भूस्खलनामुळे २ हजारांहून अधिक लोक ढिगाऱ्याखाली जिवंत गाडले गेल्याचे सांगण्यात आले आहे. सरकारने सांगितले की त्यांनी औपचारिकपणे मदत कार्यांसाठी आंतरराष्ट्रीय मदत मागितली आहे.

यापूर्वी, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM) ने पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलनामुळे 670 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या या संस्थेच्या आकडेवारीपेक्षा सरकारची आकडेवारी जवळपास तिप्पट आहे. रविवारी संयुक्त राष्ट्रांच्या स्थानिक समन्वयकांना लिहिलेल्या पत्रात, दक्षिण पॅसिफिक बेट राष्ट्राच्या राष्ट्रीय आपत्ती केंद्राचे कार्यकारी संचालक म्हणाले की भूस्खलनाने 2,000 हून अधिक लोक जिवंत गाडले गेले आहेत तर या ठिकाणी मोठा विनाश झाला आहे.

भूस्खलनामुळे झालेल्या मृतांच्या संख्येचा अंदाज मोठ्या प्रमाणात बदलतो आणि अधिकाऱ्यांनी बळींची संख्या कशी मोजली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलनाच्या ठिकाणी मदत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने सोमवारी विमाने आणि इतर उपकरणे पाठवण्याची तयारी केली आहे. पापुआ न्यू गिनीच्या डोंगराळ भागात रात्रभर पडलेल्या पावसानंतर, शेकडो गावकऱ्यांना गाडलेले ढिगारे धोकादायकपणे अस्थिर असू शकतात अशी भीती आहे.

ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स म्हणाले की, त्यांचे अधिकारी त्यांच्या पापुआ न्यू गिनी समकक्षांशी शुक्रवारपासून संपर्कात आहेत. देशाची राजधानी पोर्ट मोरेस्बीच्या वायव्येस सुमारे 600 किलोमीटर अंतरावर असलेल्या एन्गा प्रांतात शुक्रवारी भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनात ठार झालेल्या सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

न्यू गिनी सरकारने यूएनला लिहिलेल्या पत्रात किमान २ हजार लोकांना जिवंत गाडले गेल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय अनेक इमारती आणि उद्यानांचेही नुकसान झाले आहे. या भूस्खलनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचेही मोठे नुकसान झाले आहे. राजधानी पोर्ट मोरेस्बीपासून सुमारे 600 किलोमीटर अंतरावरील एका दुर्गम गावात भूस्खलन झाले आहे. चार फुटबॉल मैदानांएवढी जमीन स्थलांतरित झाल्याची नोंद आहे. यंबळी गावातील सुमारे दीडशे घरे या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. या भागात अजूनही धोका असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

भूस्खलन का झाले?

एवढ्या मोठ्या भागात भूस्खलन झाल्यानंतर मदत कर्मचाऱ्यांनाही अडचणी येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लोकांना वाचवता यावे यासाठी कुठे खोदकाम सुरू करायचे हे ठरवणे त्यांच्यासाठी अवघड आहे. या भूस्खलनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामागे भूकंप हे कारण असू शकते, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर ज्या भागात भूस्खलन झाले आहे त्या भागात भरपूर पाऊस पडत आहे. अतिवृष्टी हेही यामागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. अतिवृष्टीमुळे धूप झाली असावी आणि त्यामुळे डोंगरावरील जमीन सरकली असावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT