bangladesh, pakistan 
ग्लोबल

'पाकने केलेला नरसंहार अन् लाखो महिलांवरील बलात्कार देश विसरलेला नाही'

सुशांत जाधव

1971 मध्ये मुक्ती युद्धामुळे देशातील मोठा हिस्सा गमावलेला पाकिस्तान चीनच्या सांगण्यावरुन आता बांगलादेशसोबत मैत्रीसाठी प्रयत्न करत आहे. पाकिस्तान भलेही पाच दशकापूर्वीच घटना विसरला असेल पण कोटयवधी जनतेच्या काळजाला झालेल्या जखमा आम्ही बांगलादेश अद्यापही विसरलेला नाही. पाकिस्तानमधील नरसंहार आणि महिलांवर झालेला बलात्काराची घटना आम्ही विसरलेलो नाही, असे सांगत बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला सुनावले आहे. जनतेवर झालेल्या अन्यायानंतर पाकने कधीही माफी मागितली नाही, असा उल्लेख करत बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानसोबतचे संबंध अजूनही टोकाचे आहेत, असे संकेत दिले आहेत.   

भारताविरोधातील रणनितीच्या पार्श्वभूमीवर चीनच्या सांगण्यावर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी 22 जुलै रोजी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली होती. दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी पूरजन्य आणि कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशिवाय द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या संदर्भातही चर्चा केल्याचे वृत्त होते. यावेळी पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दाही उपस्थितीत केला. या भेटीनंतर बांगलादेश काय भूमिका घेणार याची चर्चा आंतरराष्ट्रीय राजकारणात सुरु झाली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय राजकीय विश्लेषकांनी दोन्ही राष्ट्रांतील इतिहासामुळे इस्लामाबाद-ढाका यांच्यातील संबंध सुरळीत होतील, यावर शंका व्यक्त करण्यात येत  आहे.  

बांग्ला न्यूज 24 च्या वृत्तानुसार, पाकिस्तानसोबतची बैठकीला बांगलादेशने सकारात्मक उत्तर दिले तर भारत-चीन यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीत बांगलादेशची भूमिका नेमकी काय आहे हे स्पष्ट होईल. दरम्यान बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री एके अब्दुल मेनन यांनी पाक-बांगलादेश पंतप्रधानांच्या भेटीसंदर्भात भाष्य केले आहे. ते म्हणाले की, इमरान खान यांनी कोवि-19 आणि पूरजन्य परिस्थितीवर चर्चा केली. या बैठकीत अन्य कोणत्याही मुद्यावर चर्चा झालेली नाही. पाकिस्तान आमच्यासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यास इच्छुक असेल तर ती चांगली बाब आहे. मुक्ती युद्धावेळी पाकिस्तानने 30 लाख लोकांचा केलेला नरसंहार आणि लाखो लोकांवर केलेला बलात्कार देश विसरलेला नाही, असा उल्लेखही त्यांनी केला.   

मेनन म्हणाले की,  1971 च्या मुक्ती युद्धावेळी पाकिस्तानने जो  नरसंहार केला त्याबदद्दल त्यांनी आतापर्यंत कधीही माफी मागितलेली नाही. आम्ही सर्वांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत याच विचारसरणीचे आहोत. पण जर ते माफी मागत नसतील तर त्यांच्यासोबत मैत्रीचा हात कसे पुढे करणार? पाकिस्तानने केलेला अत्याचार देश विसरला नसल्याचे सांगत पाक-बांगलादेश मैत्री सध्याच्या घडीला शक्य नाही, असेच संकेत परराष्ट्र मंत्र्यांनी दिले आहेत.   
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT