Migration 
ग्लोबल

सुदान पुन्हा संघर्षाच्या वाटेवर; तीन दिवसांत एवढ्या जणांचे स्थलांतर

वृत्तसंस्था

खार्तुम - सुदानच्या गेल्या दोन दशकांपासून संघर्षग्रस्त असलेल्या दार्फूर प्रांतातील पश्‍चिम, दक्षिण आणि उत्तर भागात गेल्या महिन्याभरापासून जातीय दंगलींनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यावेळी त्यांची तीव्रता मोठी असून गेल्या वर्षभरात या भागातून जितक्या लोकांनी स्थलांतर केले नव्हते, त्याहून अधिक लोकांनी केवळ तीनच दिवसांत केल्याचे निदर्शनास आले आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे ‘इंटर्नल डिस्प्लेसमेंट मॉनिटरिंग सेंटर’ने म्हटले आहे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दार्फूर भागात २००३ पासून अरब आणि अरब नसलेल्या समुदायांमध्ये हिंसक संघर्ष सुरु आहे. गेल्या महिन्यातही १५ ते १८ जानेवारी दरम्यान अरब आणि मसालित समुदायातील सशस्त्र गटांनी एकमेकांविरोधात हल्ले सुरु केल्याने हा प्रांत अशांत झाला आहे. या तीन दिवसांतच एक लाख ८३ हजार जणांनी स्थलांतर केले. विशेष म्हणजे, यातील ६० टक्क्यांहून अधिक जण १८ वर्षांखालील आहे. स्थलांतरीतांसाठी तयार केलेल्या छावण्या पूर्ण भरल्या असून अनेक जण झाडांखालीच झोपत आहेत. येथील परिस्थिती बिकट असून या लोकांना अन्न, पिण्याचे पाणी आणि इतर आरोग्य सुविधांची तातडीने गरज असल्याचे मानवाधिकार संघटनांचे म्हणणे आहे.  

सुदानमधील संघर्ष कमी करण्यासाठी या महिन्यातच सध्याच्या हंगामी सरकारने अनेक बंडखोर नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. मात्र, अनेक बंडखोर गटांनी संधीचा करार नाकारला असल्याने शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता धूसर होत आहे. सुदानमध्ये वारंवार संघर्ष उफाळून येत असल्याने स्थलांतर नित्याचे झाले आहे. २००५ मध्ये जवळपास ६१ लाख लोकांनी स्थलांतर केले होते. यातील अनेक जण आता दक्षिण सुदानमध्ये रहात आहेत. सुदानमध्ये अद्याही २१ लाख देशांतर्गत स्थलांतरीत आहेत.

सुदानमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अनेक प्रकारचे संघर्ष पहायला मिळाले आहेत. तरीही स्थलांतराचे प्रमाण घटत चालले होते. मात्र, वारंवार डोके वर काढणाऱ्या संघर्षावर तोडगा काढण्याचा प्रयत्न अजिबात झाला नाही. अरब-अरबेतर समुदायांमधील संघर्षाबरोबरच शेतकरी आणि भटक्या जातींमधील संघर्षही मध्यंतरी पेटला होता.

दार्फूर प्रांत पुन्हा एकदा संघर्षाच्या खाईत जाण्याच्या टप्प्यावर आहे. सध्याच्या संघर्षाची तीव्रता पाहता लाखो लोक आताच रस्त्यावर आले असून यात वाढ होण्याची शक्यता आहे. हे लोक पुन्हा आपल्या घरी जाण्याची शक्यता कमीच आहे. 
- अलेक्झांड्रा बिलाक, संचालक, आयडीएमसी

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

IND vs ENG 3rd Test: रिषभ पंतने २५ मिनिटं नेट्समध्ये फलंदाजी केली, पण...! जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स, Video

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

SCROLL FOR NEXT