TS Tirumurti Sakal
ग्लोबल

दहशतवादाला संरक्षण देणारे देश दोषी - तिरुमूर्ती

दहशतवादीविरोधी सप्ताहाच्या दुसऱ्या आठवड्यात ‘कोरोनानंतरच्या काळातील दहशतवाद्यांना आर्थिक मदत रोखणे’ या विषयावर उच्चस्तरिय कार्यक्रमाचे ऑनलाइन पद्धतीने शुक्रवारी (ता.२५) झाला.

पीटीआय

न्यूयॉर्क - गेल्या अनेक दशकांपासून भारत (India) हा दहशतवादाचा (Terrorist) विशेषतः सीमेपलीकडील दहशतवाद बळी ठरत आहे. दहशतवादी कारवायांना मदत करणे, प्रोत्साहन देणारे व त्यांना संरक्षण देणारे काही देश खरे दोषी आहे, असे भारताने संयुक्त राष्ट्रात (यूएन) स्पष्टपणे सांगितले. यात अप्रत्यक्षपणे भारताचा इशारा पाकिस्तानकडे होता. (Countries that Protect Terrorism are to Blame TS Tirumurti)

दहशतवादीविरोधी सप्ताहाच्या दुसऱ्या आठवड्यात ‘कोरोनानंतरच्या काळातील दहशतवाद्यांना आर्थिक मदत रोखणे’ या विषयावर उच्चस्तरिय कार्यक्रमाचे ऑनलाइन पद्धतीने शुक्रवारी (ता.२५) झाला. यात भाग घेतलेले ‘यूएन’मधील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती म्‍हणाले की, दहशतवादाला यशस्वीपणे नामोहरम करण्यासाठी दहशतवाद्यांचे आर्थिक स्रोत बंद करणे आवश्‍यक आहे. ‘भारत गेल्या काही दशकांपासून दहशतवादाला बळी ठरत आहे. विशेष करून सीमेपलीकडील दहशतवादाचा धोका भारताला आहे.

काही असे देश आहेत ज्यांच्याकडे दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडण्यासाठी आवश्‍यक क्षमता आणि कायदे व्यवस्थेचा अभाव आहे. त्याचवेळी काही देश दहशतवादाला मदत, पाठिंबा देतात व स्वतःहून आर्थिक साह्य करीत सुरक्षित आश्रय देतात, ते खरे दोषी आहेत,’ असे त्यांनी नमूद केले. कमकुवत देशांच्या क्षमता वाढविण्यास आपण मदत केली पाहिजे’, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT