Libya Flood Update eSakal
ग्लोबल

Libya Flood Update : लीबियामध्ये महापूर! मृतांची संख्या सहा हजारांवर, 30 हजारांहून अधिक बेपत्ता

Libya : लीबियामध्ये सोमवारी आलेल्या महापुरामुळे कित्येक किनारी शहरं उद्ध्वस्त झाली आहेत.

Sudesh

लीबियामध्ये सोमवारी आलेल्या महापुरामुळे कित्येक किनारी शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. या पुरामध्ये आतापर्यंत तब्बल सहा हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. लीबियामधील संयुक्त सरकारचे आरोग्य सहाय्यक सचिव सादेद्दीन अब्दुल वाकिल यांनी याबाबत माहिती दिली.

भूमध्य समुद्रात आलेल्या डॅनियल वादळामुळे लीबियामध्ये महापूर आला आहे. किनारी भागात असलेल्या एकट्या डेर्ना शहरातच 30 हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता असल्याचं इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने म्हटलं आहे.

शहरात जाणंही अवघड

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, किनारी भागातील शहरं एवढी उद्ध्वस्त झाली आहेत, की त्याठिकाणी जाणंही अवघड होत आहे. डेर्ना शहरातील सात एंट्री पॉइंटमधील केवळ दोनच सध्या सुरू झाले आहेत. अधिकारी शहरांमधील मलबा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

नागरिक समुद्रात वाहून गेल्याची भीती

दहा हजारांहून अधिक नागरिक मलब्याखाली दबले गेले असावेत, आणि तेवढेच लोक समुद्रात वाहून गेले असण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. किनारी भागांतील शहरांमध्ये सुमारे एक लाख लोक राहत होते, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT