india vs china 
ग्लोबल

...अन्यथा भारताला परिणामांना सामोरे जावे लागेल; चीनची पुन्हा आगळीक

कार्तिक पुजारी (Kartik Pujarai)

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये सीमेवरुन तणावाची स्थिती आहे. चीनने दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या स्थितीवर भाष्य केलं आहे. दोन्ही देशांनी गलवान खोऱ्यातील तणाव कमी करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. उभय देशांनी गलवान खोरे आणि इतर भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही देशातील स्थिती सुधारत आहे, असं चीनने म्हटलं आहे.  

चीनच्या म्हणण्यानुसार, ज्या भागात वादाची स्थिती आहे त्या भागातून दोन्ही देशाच्या सैन्याने माघार घेण्याचे मान्य केले आहे. मात्र, चिनी राज्य मीडिया वारंवार भारतावर टीका करत आक्रमकपणा दाखवत आहे. भारताने उभय देशात झालेला करार मोडू नये आणि भारतीय सैन्याने सीमेपासून दूर रहावे. भारताने कराराचे उल्लंघन केल्याचे त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात, असा धमकीवजा इशारा चिनी माध्यमांकडून देण्यात येत आहे. चिनी माध्यमे हे सरकार पुरस्कृत असतात, त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला विशेष महत्व आहे.

भारत आणि चीनच्या सैनिकांमघ्ये 15 जून रोजी पूर्व लडाखमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. तर चीनने आपली जीवितहानी जाहीर करण्यास नकार दिला होता. चीनच्या या कृतीमुळे भारतीयांमध्ये संतापाची लाट आहे. भारत सरकारने चीनला धडा शिकवण्यासाठी कंबर कसली होती. त्यामुळे दोन्ही देशांमधील स्थिती अत्यंत स्फोटक बनली. उभय देशांनी सीमा भागात सैनिकांची मोठ्या प्रमाणात आवक केली. तसेच शस्त्रास्त्र उपकरणे सीमा भागात आणली जात होती. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांचे जवळजवळ 30 हजार सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

भारताने इतर मार्गांनीही चीनची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला होता. टिकटॉकसह 59 चिनी कंपन्यांच्या अॅपवर भारताने बंदी आणली आहे. तसेच चिनी कंपन्यांच्या भारतातील गुंतवणुकीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. शिवाय भारताने चीनविरोधात आंतरराष्ट्रीय आघाडी उघडण्याचा प्रयत्न चालवला होता. यामुळे चीनवर सैन्य मागे घेण्यासाठी दबाव वाढत होता. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यासोबत दुरध्वनीवरुन 2 तास चर्चा केली होती. त्यानंतर दोन्ही देशांनी आपापले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दोन्ही सैन्य 2 किलोमीटरपर्यंत मागे हटल्याची माहिती दिली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dam Water Level : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! धरणांमध्ये 70 टक्के पाणीसाठा, पाणीटंचाईला दिलासा!

Nagpur News : सांगा, कसं करायचं आपत्ती व्यवस्थापन? अनेक गावं धोकादायक पातळीवर, पण सरकार अजूनही झोपेत, ९१ गावांत ‘व्हिलेज किट’च नाही...

Guru Purnima : 'श्री स्वामीचरणी तीन लाख भाविक नतमस्तक'; स्वामीनामाच्या जयघोषात श्री वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा साजरी

11th Admission Process: अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी 'या' तारखेला होणार जाहीर; जाणून घ्या जाणून घ्या प्रवेशाचे पुढचे टप्पे

धक्कादायक! प्रेमसंबंधातून जन्मदात्या आईने पोटच्या तीन निष्पाप मुलांची केली हत्या; प्रियकराला जन्मठेप तर, आईला मृत्युदंडाची शिक्षा

SCROLL FOR NEXT