Germany US block China’s anti-India move at UNSC Sakal
ग्लोबल

Explained: भारत कधी होणार UNSC चा सदस्य? 'या' कारणांमुळे जगातल्या सर्वात शक्तिशाली संघटनेत होऊ शकत नाही सहभागी

भारत आत्तापर्यंत ८ वेळा या संघटनेचा अस्थायी सदस्य होता. गेल्या वर्षी भारताचं सदस्यत्व संपलं.

वैष्णवी कारंजकर

भारत गेल्यावर्षी जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश ठरला आहे. ही जागा भारताला आपल्यावर अनेक वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटनला मागे टाकून मिळाली आहे. सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनण्यासोबतच जागतिक स्तरावरही भारताची प्रतिमा अधिक तेजस्वी होत आहे. जे देश भारताला महत्त्व देत नव्हते, असे देशही आता भारताला विविध कार्यक्रमांसाठी निमंत्रण देत आहेत.

पण अजूनही एक संघटना अशी आहे जिथे भारताचा समावेश नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद असं या संघटनेचं नाव आहे. या संघटनेला जगातली एक शक्तिशाली संघटना मानलं जातं. या संघटनेकडे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेची जबाबदारी असते. या संघटनेच्या निर्णयांचा थेट प्रभाव जगातल्या प्रत्येक देशावर पडतो. एवढंच नव्हे या संघटनेकडून वर्ल्ड बँकेसारख्या मोठ्या संस्थांवरही प्रभाव टाकता येऊ शकतो.

संयुक्त राष्ट्राच्या अनेक उपशाखा आहेत. यामधीलच एक म्हणजे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद. संयुक्त राष्ट्रांची ही सर्वात शक्तिशाली शाखा आहे. यामध्ये १५ सदस्यांची जागा आहे. या संस्थेचं सदस्यत्व दोन प्रकारचं आहे - स्थायी आणि अस्थायी. अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स आणि चीन हे पाच देश या संघटनेचे कायमस्वरुपी सदस्य आहेत. याशिवाय १० देश असे आहेत, जे दरवर्षी बदलतात.

सगळी शक्ती या पाच स्थायी सदस्य देशांकडे एकवटलेली आहे. कोणत्या देशांना आमंत्रण द्यायचं याचा निर्णय हे पाच देश घेतात. भारत आत्तापर्यंत ८ वेळा या संघटनेचा अस्थायी सदस्य होता. गेल्या वर्षी भारताचं सदस्यत्व संपलं. पण आता काहीतरी नवा बदल घडण्याची शक्यता आहे. या संघटनेच्या कायमस्वरुपी सदस्यांची संख्या वाढायला हवी, यावर भारत जोर देत आहे.परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्वतः सांगितलं की भारत लवकरच सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य बनू शकतो. यासाठी या संघटनेचे चार सदस्य देशही प्रयत्न करत आहे. पण पाचवा सदस्य म्हणजे चीन यामध्ये अडथळे निर्माण करत आहे. कोणताही निर्णय घेण्यासाठी पाचही सदस्यांचं एकमत आवश्यक असल्याने भारताचं सदस्यत्व लांबणीवर पडत आहे.

चीनचा विरोध का आहे?

चीन आणि भारताचे संबंध पूर्वीपासूनच विशेष चांगले नाहीत. कोरोना काळातही लडाखच्या सीमाभागामध्ये तणाव निर्माण झाला होता. चीन अनेक कारणांमुळे पाकिस्तान आणि काश्मीरच्या मुद्द्याला हवा देत आहे. भारत या संघटनेमध्ये आपल्यासोबत जपानला घेऊ इच्छित आहे. पण चीन आणि जपानचे संबंध चांगले नसल्याने चीनचा या गोष्टीला विरोध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझी अटक बेकायदेशीर'' वाल्मिक कराडचं नेमकं म्हणणं काय? उज्ज्वल निकमांनी गैरसमज दूर केला

Latest Marathi News Live Updates : उपनगरात पावसाने घेतली उसंत, मुंबईकरांना काहीसा दिलासा

Asia Cup 2025 : सूर्यकुमार यादवसह ८ खेळाडू ठरले, ७ खेळाडूंवरून घोडे अडले! गौतम गंभीर, अजित आगरकरच्या घोषणेकडे लक्ष

Sarfaraz Khan Century: कसोटी संघातून वगळले, त्या सर्फराजने खणखणीत शतक झळकावून निवड समितीला उत्तर दिले

Nashik Water Supply : इंदिरानगरची पाण्याची समस्या सुटणार; जलवाहिनी टाकण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाची परवानगी

SCROLL FOR NEXT