ग्लोबल

Shri Lanka Crisis: पळून गेलेले माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देशात परतले!

13 जुलै रोजी देश सोडून पळ काढला होता

सकाळ डिजिटल टीम

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे शुक्रवारी थायलंडहून मायदेशी परतले आहेत. याआधी शनिवारी सकाळी ते श्रीलंकेला परतल्याची बातमी आली होती. आर्थिक संकटातून जात असलेल्या श्रीलंकेत दोन महिन्यांपूर्वी गोटाबाया यांच्या सरकारविरोधातील निदर्शने तीव्र झाल्यानंतर 73 वर्षीय राजपक्षे यांनी 13 जुलै रोजी देश सोडून पळ काढला होता. श्रीलंका इतिहासातील सर्वात भीषण आर्थिक संकटाचा सध्या सामना करत आहे. खाद्यपदार्थांपासून ते इंधनापर्यंत सर्वच गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला असून जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गोटाबाया सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानाने श्रीलंकेला परतले होते. 9 जुलै रोजी निदर्शक कोलंबोतील राष्ट्रपती भवनात घुसले. इतर अनेक सरकारी इमारतींवरही आंदोलकांनी ताबा मिळवला होता. यानंतर गोटाबाया श्रीलंकेच्या हवाई दलाच्या विमानाने मालदीवला पळून गेले आणि तेथून सिंगापूरला गेले. तेथून त्यांनी 14 जुलै रोजी राजीनामा पाठवला, त्यानंतर ते थायलंडला गेले जेथे त्यांनी तात्पुरता आश्रय घेतला होता.

गोटाबाया राजपक्षे श्रीलंकेत परतण्यापूर्वी ते शुक्रवारी किंवा शनिवारी परततील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. यासोबतच त्याच्या परतीच्या वृत्ताला थायलंडच्या मीडियानेही दुजोरा दिला आहे. गोटाबाया जुलैमध्ये देश सोडून प्रथम मालदीवमध्ये पळून गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election साठी भाजप-शिवसेना एकत्र, पण राष्ट्रवादीचा उल्लेख नाही, जागावाटपाचा फॉर्म्युलाच सांगितला!

Dhurandhar Craze in Pakistan: पाकिस्तानात ‘धुरंधर’ पाहण्याची क्रेझ! बंदी असतानाही लोक कसे पाहतायत चित्रपट?

Kolhapur Property Survey : करवीर तालुक्यात ऐतिहासिक सर्वेक्षण; १३२ गावांतील ४० हजार मिळकतींना युनिक ओळख

Agriculture News : नाशिकमध्ये रब्बी पीकविम्याला थंडा प्रतिसाद! ४ लाख शेतकरी विम्यापासून दूर; काय आहे कारण?

Latest Marathi News Live Update : वर्धेच्या देवळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा

SCROLL FOR NEXT