नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असताना आफ्रिकेमधील काँगो देशात इबोला या घातक विषाणूचा संसर्ग झाल्याची नवीन सहा प्रकरणे समोर आली आहेत. या सहा जणांपैकी चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं एक पत्रकही जारी केलं आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
एप्रिल महिन्यामध्येच येथील बेनी शहरात इबोलामुळे दोघांचा मृत्यू झाला होता. असे असताना आता या ठिकाणापासून जवळजवळ हजार किलोमीटर दूर असणाऱ्या ठिकाणी म्हणजेच म्बानडाका शहरामध्ये इबोलाचे रुग्ण अढळून आले आहेत. त्यामुळे या विषाणूने एवढा लांब पल्ल्यावरील अंतर कसे कापले यासंदर्भात तर्क वितर्क मांडले जात आहेत. आता हे इबोलाचे नवे केंद्र असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एप्रिल महिन्यामध्ये काँगोमध्ये २० महिन्यांच्या इबोलाविरोधात मोहीमेनंतर इबोलामुक्तीची घोषणा करण्यात येणार होती. मात्र त्याच्या तीन दिवस आधीच देशामध्ये इबोलाची नवीन प्रकरणे आढळून आली आहेत. १३ एप्रिल रोजी काँगोमध्ये इबोला विषाणूजन्य तापाची दहावी साथ संपल्याचे जाहीर करण्याची तयारी जागतिक आरोग्य संघटनेने केली होती. मात्र, १० एप्रिल रोजी २६ वर्षीय पुरुषाचा आणि १२ एप्रिल रोजी एक तरुण मुलीचा मृत्यू झाल्याने इबोलामुक्ती झाली नाही हे स्पष्ट झाले.
इबोलामुळे नेमका काय त्रास होतो?
इबोलामुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन ताप येत असतो. हा विषाणू वटवाघळात सापडतो. पण वटवाघळांना त्यामुळे काही होत नाही ज्या लोकांना संसर्ग होतो ते मात्र तापाने आजारी पडतात. माकडे, काळविटे त्याने संसर्गित होतात. त्यांच्यातूनही हा विषाणू माणसात येतो. ताप, स्नायूदुखी, उलट्या, अतिसार, मूत्रपिंड व यकृत निकामी होणे, अंतर्गत व बा रक्तस्राव अशी लक्षणे असतात. काँगोतील नदीच्या नावावरून या विषाणूला इबोला हे नाव देण्यात आले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.